raju_shetti_
raju_shetti_

आम्हाला केवळ हातकणंगले देऊन आघाडी  होणार नाही : राजू शेट्टी 

आम्ही माढा, वर्धा, बुलढाणा,धुळे,सांगली,कोल्हापूर या सात मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी केलीय.-राजू शेट्टी

पुणे : "आम्ही केवळ हातकणंगले  मागत नाही,तो आमच्या हक्काचा मतदारसंघ आहे.तो दिला की आमची आघाडीशी युती झाली असं नाही, "असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ' सरकारनामा'शी बोलताना सांगितले . 

"आम्ही जिथं शंभर टक्के निवडून येणार आहोत तो मतदारसंघ सोडला की आम्ही आघाडीसोबत जाणार अस चित्र निर्माण झालं आहे. पण आम्ही  माढा, वर्धा, बुलढाणा,धुळे,सांगली,कोल्हापूर  या सात मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी केलीय.तिथं आमची ताकद आहे.यापैकी काही जागावर आमचा आग्रह आहे.या जागापैकी कोणत्या जागा हव्यात हे आम्ही आघाडीच्या बैठकीत सांगू."असे ते म्हणाले.

"हातकणंगले मतदारसंघात शेतकरी एकजुटीची शक्ती निर्माण झाली आहे.या एकजुटीमुळे तो मतदारसंघ आमचा बालेकिल्ला झाला आहे मग आमचाच मतदारसंघ आम्हाला  देणारे  हे कोण?" असा सवाल त्यानी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com