फडणवीसांच्या मागे सरकार लावणार चौकशीचा भुंगा !

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार कोटींचा गोंधळ असून आर्थिक घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. जे रेकॉर्डला आहे, त्याची आम्ही दखल घेणार. -जयंत पाटील
devendra_and_jayant_patil
devendra_and_jayant_patil

नागपूर : भाजप सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. कॅगने जे मुद्दे मांडले असून ताशेरे ही ओढले आहेत. छत्रपती शिवाजी स्मारकाच्या बाबतीतही अतिशय गंभीर मुद्दे त्यांनी मांडले आहे. वेळ पडल्यास अशा आर्थिक गैरव्यवहारची चौकशीही करणार, अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.


'देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार कोटींचा गोंधळ असून आर्थिक घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. जे रेकॉर्डला आहे, त्याची आम्ही दखल घेणार आहेत. तसेच, कॅगच्या मुद्यांची नोंद घ्यावी लागणार आहे.

याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजेच अजित पवार निर्दोष आहेत. हे त्यांना माहीत होते, असेही पाटील यांनी सांगितले. भाजपाने अजित पवार यांच्यावर खोटे आरोप केले आणि ते एसीबीने सुद्धा सिद्ध केले, असेही म्हणत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com