होय, आम्ही शरद पवारांचे मार्गदर्शन घेतो : संजय राऊत

''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोठे नेते आहेत, ते अनुभवी आहेत. सध्या जोमहाराष्ट्र मध्ये चक्रव्युव्ह तयार झाला आहे. त्यात त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेतो," असे सूचक विधान शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला उद्देशून केले आहे.. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांच्यासाठी पद लहान आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठे आहे, असेही राऊत म्हणाले.
Sharad Pawar - Sanjay Raut
Sharad Pawar - Sanjay Raut

मुंबई : ''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोठे नेते आहेत, ते अनुभवी आहेत. सध्या जो महाराष्ट्र मध्ये चक्रव्युव्ह तयार झाला आहे. त्यात त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेतो," असे सूचक विधान शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला उद्देशून केले आहे..  शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांच्यासाठी पद लहान आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठे आहे, असेही राऊत म्हणाले. 

याबाबत बोलताना ते म्हणाले, "सध्याच्या राजकीय परिस्थिती मध्ये काय होऊ शकेल हे 'सामना' मध्ये हे लिहिण्यात आले आहे. सगळे पर्याय जवळपास फेल गेले आहेत. वानखडे , रेसकोर्स हे ठिकाणं बुक करण्यात आल्याची चर्चा आह. पण नेमके शपथविधी होणार कधी? हा आमचा प्रश्न आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचा  शपथविधी हा शिवतीर्थावर होणार आहे."

ते पुढे म्हणाले, "चर्चा जवळपास संपलेली आहे. उद्धव ठाकरे हे त्यांच्या निर्णयावर पोहोचले आहेत. लवकर जनतेपुढे येईलच. सरकार ने मुंबईचे मैदान, गेस्ट हाऊस बुक केले आहेत याचे आमच्या कडे डॉक्युमेंट्स देखील आहेत. मुंबईची अनेक गेस्ट हाऊस बुक करण्यात आली आहेत.  पण सरकार स्थापनेचा दावा का करण्यात येत नाही? मी जे काही अमित शाह यांना ओळखतो  त्यावरून ते फार स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर अमित शाह लक्ष देत नाही आहेत हे देखील सत्य आहे. अमित शाह काही बोलत नाहीत हे रहस्यमय आहे,''

राऊत पुढे म्हणाले, "लवकरच गोउपयस्फोट करू. सरकार बनवण्यासाठी गुंडांचा वापर केला जात आहे. आमच्या कडे सगळी माहिती आहे.ईडी , सीबीआय चा वापर सरकार बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी केला आहे ते जास्त वेळ टिकले नाहीत. काही क्रिमिनल आहेत जे जेल मधून बाहेर आल्यावर सत्तेत मोठ्या मोठ्या पदा वर आहेत. गुंडांचा व सरकारी यंत्रणेचा वापर करून दबाव आणला जात आहे. गेल्या काही दिवसापासून याची सगळीडिटेल्स माझ्या कडे आली आहेत. असं घाणेरडं राजकारण गुंडांच्या टोळी देखील करणार नाहीत.''

''महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली व पक्ष प्रमुख यांनी त्या दिवशी घेतलेल्या निर्णया मुळे चर्चा थांबली.सत्ता गेल्यावर आसपासची माकडं आणि कुत्री पण थांबत नाहीत.ऑपरेशन लोटस महाराष्ट्र मध्ये चालणार नाही. 170 पेक्षा ज्यास्त आकडे हे आमच्या कडे आहेत," असेही राऊत म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com