पुण्याचे पुढच्या 50 वर्षांचे नियोजन आम्ही केलयं : देवेंद्र फडणवीस

पुण्याचे पुढच्या 50 वर्षांचे नियोजन आम्ही केलयं : देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे शहराचे पुढच्या 50 वर्षांचे नियोजन भाजप सरकारने केले असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील जनतेने पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी गिरीश बापट यांना लोकसभेत पाठवावे, असे आवाहन केले.

भाजपचे उमेदवार बापट यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची पुण्यातील पहिली सभा चंदननगर येथे झाली. या वेळी त्यांनी केंद्र सरकारची कामगिरी, पाकिस्तानला दिलेले चोख प्रत्युत्तर, पुण्यासाठी भाजपने केलेले काम यावर भर दिला.

ते म्हणाले की पुण्याचा विकास आराखडा असो की येथील वाहतूक व्यवस्था यात सरकारने गतीने निर्णय घेतले. पुण्याच्या मेट्रोचे काम सुरू झाले. बस, मेट्रो यांच्या सेवा सुधारल्यानंतर पुणेकरांना दिलासा देऊ. पुण्यात माण-मारूंजी येथे आयटी उद्योगासाठी नवीन केंद्र निर्माण होत आहे. पुण्याच्या परिसरातील रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे आधीच्या सरकारपेक्षा अधिक उजवे काम भाजप सरकारने केले आहे.

त्यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानातील बालाकोट हल्ल्याचा विषय सविस्तरपणे मांडला. काॅंग्रेसची मंडळी मात्र लष्कराच्या कामगिरीवर संशय घेत असल्याचा आरोप केला. काॅंग्रेसच्या जाहीरनाम्याची त्यांनी खिल्ली उडविली. देशद्रोहाचे कलम कायद्यातून काढून टाकण्याचे काॅग्रेसचे आश्वासन हे घातक असल्याची टीका त्यांनी केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com