युतीतील नाराज असणार वंचितचे शिलेदार !

आपल्याला विधानसभा निवडणुकीची संधी मिळेल या आशेने आतापर्यंत राज्यभरातून सुमारे दीड हजार इच्छूकांनी मुलाखती दिल्याची चर्चा आहे.
prakash_ambedkar
prakash_ambedkar

सोलापूर  : काँग्रेसला दिलेले मुदत उलटून गेली असली तरी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अजून पुढचे पाऊल टाकलेले नाही . याचाच अर्थ ते अजून काँग्रेसला वेळ दिल्यासारखे करीत आहेत . पण प्रकाश आंबेडकरांनी मागितलेल्या जागा  आणि घातलेल्या अटी पाहता वंचित आणि काँग्रेस आघाडी एकत्र येण्याच्या शक्यता धूसर झाली आहे . 

दरम्यान  येत्या पंधरा दिवसात शिवसेना भाजप  युतीचे आणि उमेदवाराचे चित्र स्पष्ट होईल . त्या सुमारास वंचित आघाडीलाही आपले  उमेदवार जाहीर  करावे लागतील . 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत आगामी निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीच विरोधी पक्ष म्हणून दिसेल, असे भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  दरम्यान, युतीत जागा भाजपला सुटली नाही तर भाजपचे बंडखोर वंचित आघडीच्या आश्रयाला जाऊ शकतात .

 तसेच असे शिवसेनेतील नाराजही वंचितकडे जाऊ शकतात . ज्या मतदारसंघात दलित - मुस्लिम मतदार निर्णायक आहे तेथे काँग्रेसपेक्षाही वंचितच्या उमेदवारीवर उड्या  आहेत .   

वंचित आघाडीच्या  इच्छूकांच्या मुलाखतीही पार पडल्या, ऑगस्टअखेर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करु, अशी घोषणाही झाली. मात्र, शिवसेना- भाजप युतीनंतर त्या पक्षांमधील नाराज नेते वंचितच्या माध्यमातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा असल्याने उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झाली नसल्याची चर्चा आहे. 

लोकसभा निवडणुकीत सुमारे 42 लाख मते घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीचे 50 हून अधिक उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वास वाटू लागला आहे. वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला विधानसभा निवडणुकीची संधी मिळेल या आशेने आतापर्यंत राज्यभरातून सुमारे दीड हजार इच्छूकांनी मुलाखती दिल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप एकाही उमेदवारांचे नाव फायनल झालेले नाही. 

सप्टेंबर महिन्यात 13 ते 15 तारखेदरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, नवख्या अन्‌ वंचित उमेदवारांना प्रचारासाठी, मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेळ मिळावा असे काहींना वाटते आहे .  यादृष्टीने उमेदवारांची अंतिम नावे जाहीर होणे अपेक्षित आहे. 

2014 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारला केंद्रात बहूमत दिले. आता मोदींची सुप्त लाट कायम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही बोलबाला कायम आहे. तरीही भाजपने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आयारामांना पक्षात घेतले आणि उमेदवारी अथवा मंत्रीपदाचे आश्‍वासन दिल्याची चर्चा आहे. 

त्यामुळे कित्येक वर्षांपासून पक्ष वाढीसाठी एकनिष्ठ राहिलेल्या पक्षातील सच्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान, शिवसेना- भाजपची युती झाल्यास आपल्याला यंदाही निवडणुकीची संधी मिळणार नाही, असा विश्‍वास वाटणारे आता वंचित बहूजन आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com