आंबेगावच्या सर्व नेत्यांवर हीन टीका; हेच बाणखेलेंचे काम : वळसे पाटील

आंबेगावच्या सर्व नेत्यांवर हीन टीका; हेच बाणखेलेंचे काम : वळसे पाटील

मंचर : "विरोधी उमेदवार राजाराम बाणखेले यांनी माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले, माजी आमदार शिवाजीराव बेंडे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भगिनी कल्पना आढळराव पाटील यांच्यावरही हीन पातळीवरची टीका करून अपमान करण्याचे काम केले आहे. खेड व जुन्नरच्या सभेत शिवसेना प्रमुखांनी आंबेगावच्या उमेदवाराबद्दल ब्र शब्दहि काढला नाही. यावरून या उमेदवारावर पक्षनेत्याचे किती प्रेम आहे, असा सवाल आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी- कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केला.

'विरोधी उमेदवार ओरीजनल शिवसैनिक नाही. लई फेऱ्या मारून आलाय. आमची मदत तुम्हालाच.' असे शिवसेना- भाजपचे अनेक कार्यकर्ते रात्री मोबाईलद्वारे संपर्क करून सांगतात." असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

मंचर (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.१८ ) प्रचाराच्या सांगता सभेत वळसे पाटील बोलत होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, देवेंद्र शहा, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, नाथाभाऊ शेवाळे, प्रभाकर बांगर, माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले यांचे चिंरजीव रामदास बाणखेले, नातू युवराज बाणखेले उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, "पराभूत झालेले विरोधक मला विचारतात काय विकास केला. माझ्या मांडीला मांडी लावून बसत होते. त्यावेळी त्यांना विकास दिसत होता. पण आता त्यांना विकास दिसत नाही. हे दुर्दैव आहे. मी केलेली कामे जनतेला माहित आहेत. म्हणून त्यांनी मला सलग सहा वेळा चढत्या मताधिक्याने निवडून दिले आहे. या निवडणुकीत एक लाखाच्या मताधिक्यानी विजयी करण्याचा निर्धार जनतेने केला आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे.``

शिरूर तालुक्यातील ३९ गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांविषयी चुकीचा प्रचार केला जात आहे. प्रकाशराव पवार, सदा अण्णा पवार, सुभाष उमाप, डॉ. वर्षा शिवले यांच्यासह सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. मताधिक्य देण्याविषयी गावागावत स्पर्धा सुरु आहेत. कलमोडी धरणातून वेळ नदीत पाणी सोडणार, म्हाळसाकांत सिंचन योजना राबवणार. १५ कोटी रुपये खर्चाच्या पांडवदरा- निघोटवाडी पाझर तलावाची ई- निविदा झाली आहे. तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार. विकास कामांचा वेग कायम ठेवण्यासाठी जनतेने पाठींबा व आशीर्वाद द्यावा,'' असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.

राजू इनामदार, बाळासाहेब बाणखेले, विष्णू हिंगे, शंकर पिंगळे, मयुरी थोरात यांची भाषणे झाली. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com