Ashish Mishra
Ashish Mishra

दोन दिवस उलटल्यानंतरही पोलिसांकडून मंत्र्याच्या मुलाला अटक नाही कारण...

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

लखीमपूर खीरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकऱ्यांचा (Farmers) समावेश होता. मिश्रा यांचा मुलगा आशिष यातील एक गाडी चालवत होता. त्याच्यावर खून आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, अद्याप त्याला अटक झालेली नाही. या विलंबाबत अतिरिक्त पोलीस महांसचालक एस.एन.साबत यांनी वेगळेच कारण पुढे केले आहे.

आशिष मिश्रा याला अटक का केलेली नाही, अशी विचारणा केली असता अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.एन.साबत म्हणाले की, सुरवातीला आम्ही शेतकऱ्यांनी चर्चा करण्यात गुंतलो होतो. नंतर मृत शेतकऱ्यांचे शवविच्छेदन (Post Mortem) आणि अंतसंस्कार याची जबाबदारी आमच्यावर आली होती. प्रत्येक गुन्ह्यात ठराविक प्रक्रियेचे पालन आम्हाला करावे लागते. आम्ही या प्रकरणाचा संपूर्ण तपास करू.

या गुन्ह्यातील आरोपी हा केंद्रीय मंत्र्याचा मुलगा असल्याने कारवाईला उशीर होत आहे का, अशी विचारणा साबत यांनी करण्यात आली. यावर पोलिसांची सहानुभूती ही आरोपी नव्हे तर पीडितांसोबत असते, असे त्यांना सांगितले. या प्रकरणी इतर प्रश्नांची उत्तरे देणे मात्र त्यांनी टाळले.

Ashish Mishra
होय, केंद्रीय मंत्र्याचा मुलगाच गाडी चालवत होता अन् त्यानेच आम्हाला चिरडलं!

दरम्यान, माझा मुलगा घटनास्थळी असल्याचा एक पुरावा दाखवा, मी लगेच मंत्रिपदाचा राजीनामा देतो, अशी भूमिका अजय मिश्रा यांनी घेतली आहे. ते म्हणाले की, मी अथवा माझा मुलगा घटनास्थळी नव्हतो याचा पुरावा आमच्याकडे आहे. आम्ही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत. हा कट आखणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग दिला जात आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. घटना घडली त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. परंतु, मी तेथील व्हिडीओ पाहिले आहेत. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता. माझ्या मुलाविरुद्ध केलेले सर्व आरोप निराधार आहेत. तो तिथे उपस्थित नव्हता. तो तिथे हजर असता तर आज तो जिवंत नसता.

Ashish Mishra
गुजरातमध्ये भाजपला धक्का! 26 वर्षे ताब्यात असलेली महापालिका काँग्रेसने हिरावली

मिश्रा यांचा मुलगा आशिष याने शेतकरी आंदोलकांना रिव्हॉल्वर दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचाही आरोप होत आहे. यावर अजय मिश्रा म्हणाले की, माझ्या मुलाकडे रिव्हॉल्वर असेल तर त्याचा परवानाही असेल. या घटनेत समाजवादी पक्षाचे नेते आणि खलिस्तानी शक्तींचा हात आहे. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देण्यात आले आहे. देशातील 99 टक्के शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना पाठिंबा आहे. त्यांचे आंदोलन बंद पडू लागले त्यामुळे ते अशा प्रकारच्या घटना घडवत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com