सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका...अर्णब गोस्वामींना अटकेपासून संरक्षण

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. आता हक्कभंग प्रकरणी गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Suprme Court protects Arnab Goswami from arrest in Maharashtra assembly privilege case
Suprme Court protects Arnab Goswami from arrest in Maharashtra assembly privilege case

मुंबई :  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांना विधानसभेने हक्कभंगाची नोटीसही बजावली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. हक्कभंग प्रकरणात गोस्वामी यांना अटक करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून पोलिसांना बुधवारी अटक केली होती. पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा गोस्वामी न्यायायलात केला. भाजपचे अनेक नेते हे गोस्वामींवरील कारवाईवरुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला लक्ष्य करीत आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होत आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी विधानसभेने गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावरील सुनावणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर झाली. गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस बजावल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस सरन्यायाधीशांनी बजावली आहे. 

ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांना गोस्वामी यांच्या वतीने बाजू मांडली. गोस्वामी यांच्यावर एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे त्यांना या प्रकरणात अटकेपासून संरक्षण द्यावे, असे साळवे यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत गोस्वामी यांना हक्कभंग प्रकरणात अटक करु नये, असे निर्देश सरन्यायाधीशांनी राज्य सरकारला दिले आहेत. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली.  २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

दरम्यान, गोस्वामी यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील महिला पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे गोस्वामी यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com