उच्च न्यायालयाच्या लॉकडाउनच्या आदेशाला 24 तासांतच सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानेच राज्यातील प्रमुखपाच शहरांमध्ये लॉकडाउन लावला होता.
supreme court pause allahabad high court order about lockdown in five cities
supreme court pause allahabad high court order about lockdown in five cities

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानेच राज्यातील प्रमुख पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावला आहे. याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.  

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी राज्यात 15 मेपर्यंत दर रविवारी लॉकडाउन जाहीर केला आहे. राज्यात शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची गंभीर दखल घेतली होती. राज्यातील पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काल (ता.19) दिले आहेत. प्रयागराज, लखनौ, वाराणसी, कानपूर नगर आणि गोरखपूर या शहरांत 26 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागू होणार आहे. या शहरांमध्ये लॉकडाउनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. 

लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. या पाच शहरांत फळे, भाजीपाला विक्रेत, दूध आणि ब्रेड विक्रेते यांनी दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत परवानगी असेल. त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरू राहतील, असे उच्च न्यायालयाने बजावले होते. 

याला उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता हे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांत आठवडाभरासाठी संपूर्ण लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे तातडीने या प्रकरणी सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी मेहतांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. यावर आज सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 24 तासांतच स्थगिती मिळाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात मागील 24 तासांत 18 हजार 21 रुग्ण सापडले आहेत. उत्तर प्रदेशात सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाख 8 हजार 523 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 997 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 6 लाख 61 हजार 311 रुग्ण बरे झाले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com