तो आमचा नाय तर तुमचाच व्हायरस; केजरीवालांना सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांचे उत्तर

देशातील कोरोनाची दुसरी लाट आली असून, आताच तिसऱ्या लाटेवरुन राजकारण सुरू झाले आहे.
singapore foreign ministry responds to arvind kejariwal claim about singapore variant
singapore foreign ministry responds to arvind kejariwal claim about singapore variant

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची (Covid19) दुसरी लाट आली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी सिंगापूरमधील कोरोना विषाणूच्या प्रकाराबाबत (Singapore Corona Variant) चिंता व्यक्त करीत तेथून येणारी विमाने बंद करण्याची सूचना केली होती. यावर सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हा दावा खोडून काढत केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटले होते की, सिंगापूरहून येणारी सर्व विमाने केंद्र सरकारने ताबडतोब बंद करावीत. सिंगापूरमध्ये सापडणारा कोरोनाचा विषाणूचा प्रकार दिल्लीत येऊ शकते. तो दिल्लीत आल्यास कोरोना संसर्गाची तिसरी लाट येईल. सिंगापूरमधील हा विषाणूचा प्रकार लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक आहे. याचबरोबर केंद्र सरकारने लहान मुलांसाठी लस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे. 

केजरीवाल यांच्या या विधानावर सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तातडीने उत्तर दिले. सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सिंगापूरमध्ये आढळत असलेला कोरोना विषाणूचा बी.1.617.2 हा प्रकार भारतातच पहिल्यांदा आढळला होता, अशी आठवण करुन दिली. याबाबत सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सिंगापूरमध्ये अनेक कोरोना रुग्णांमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा प्रकार पहिल्यांदा भारतातच सापडला होता. त्यामुळे सिंगापूर प्रकार हा अस्तित्वात नाही. त्यामुळे केजरीवाल यांनी केलेल्या दाव्यात तथ्य नाही. एक मोठा राजकीय नेता अशा प्रकारचे विधान करण्याआधी तथ्य तपासून पाहत नाही, हे दुर्दैवी आहे. 

देशात 24 तासांत 4 हजार 529 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 67 हजार 334 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 529 जणांचा मृत्यू झाला आहे.  देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 54 लाख 96 हजार 330 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 83 हजार 248 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com