आमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच निवडून आलात : राजू शेट्टींवर सदाभाऊंचा वार

दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणूस अशा शब्दात टीका केली होती. त्याला खोत यांनी उत्तर दिले आहे
Raju Shetty and  Sadabhau Khot
Raju Shetty and Sadabhau Khot

इस्लामपूर : राजू शेट्टी प्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाही अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. तसेच आमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच तुम्ही आमदार आणि खासदार झालात, असा टोलाही त्यांनी शेट्टी यांना लगावला आहे.

दूध दरावरून सोलापूर मध्ये राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खोत यांनी जोरदार पलटवार केला आहे. सांगलीच्या इस्लामपूर मध्ये ते बोलत होते.  दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणूस अशा शब्दात टीका केली होती.

या टीकेला उत्तर देताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांनी राजू शेट्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. "कोरोना मुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे मिळाले, दुधाला दर नाही, शिवाय शेतकऱ्यांना सरासरी ३४ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.  त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. महायुतीही आंदोलन करत आहे. तर शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना पण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आली आहे.  त्या संघटनेच्या नेत्यांनी शेतकरी प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे, असं मला वाटतं, त्यामुळे स्वाभीमानी च्या संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक महत्त्व द्यावं," असे खोत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "ठीक आहे आम्ही फालतू माणसं होतो. पण आम्ही फालतू माणसांनी संघटना वाढवली. त्यामुळे तुम्ही आमदार दोनवेळा खासदार होऊ शकलात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते बनवून तुम्ही राज्य करू शकला. पण मला त्यांच्या सारखे सरड्यासारखे रंग बदलता येत नाहीत. मला वाटतं त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असेल तर सदाभाऊचं नाव घेतल्याशिवाय ते प्रसिद्धीच्या झोतात राहू शकत नाहीत.  त्यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा." सदाभाऊ या विषयावर आवाज उठविण्यासाठी अजून चार वर्षे बाकी आहेत. २०२४ ला आपण आमने-सामने येऊ शकतो आणि एकमेकांना उत्तर देऊ शकतो,असा इशाराही खोत यांनी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com