लाल दिव्यावर नव्हे तर शेतकऱ्यांच्या लाल रक्तावर प्रेम : मुनगंटीवर 

लाल दिव्यावर नव्हे तर शेतकऱ्यांच्या लाल रक्तावर प्रेम : मुनगंटीवर 

मुंबई : आम्ही सत्तेवर नाही, सत्यावर प्रेम करणारे, लाल दिव्यावर नाही तर शेतकऱ्यांच्या लाल रक्तावर प्रेम करणारे आहोत. इतर विभागाच्या कामामध्ये निधी देताना मी काटकसर करत असेन, मात्र सरकारच्या तिजोरीवर सर्वात पहिला हक्क अन्नदात्याचा, शेतकऱ्यांचा आहे, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी व्यक्त केला. 

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित कर्जमाफी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी आपले सरकार या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. 

मुनगंटीवार म्हणाले, "" कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात यापूर्वीच 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यासाठी असलेल्या 21 हजार कोटींचा अर्थसंकल्प आम्ही 36 हजार कोटींवर नेला. कर्जमाफीबाबत अनेकांच्या मनात शंका असतील मात्र या प्रश्नावर राज्यात राजकारण होऊ नये. हा शेतकाऱ्यांचा सरकारला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आशिर्वात आहे. या निर्णयासाठी सामाजिक न्याय विभागाचा पैसा वळता केला नाही, करणार नाही. जुलैच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद असते त्यातील निधी अनुसूचित जातीसाठीची तरतूद असते. ही सुपीक डोक्‍यातून आलेली नापीक कल्पना आहे.'' 

यावेळी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, "" शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कर्जमाफीसाठीचा आग्रह धरला होता. तो मान्य केला आणि देशातली सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कर्जमाफी केली, याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com