नारायण राणे म्हणाले, "पैसे कमविणे हा शिवसेनेचा धंदा.. "

स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने आम्ही जाऊ," असे खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.
1Narayan_Rane_Uday_Samant_.jpg
1Narayan_Rane_Uday_Samant_.jpg

सिंधुदुर्ग :  "नानारला प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना आता समर्थन करताना पाहायला मिळतंय. पैसे कमविणे शिवसेनेचा धंदा आहे. काल काय बोलतील आणि आज काय बोलण्यामध्ये बदल करतील सांगू शकत नाही, पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करतात, 100 टक्के समर्थन आहे, स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने आम्ही जाऊ," असे खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

वैभव नाईक म्हणाले की नानार प्रकल्पाला आमचं कोणतंही समर्थन नाही, स्थानिक जनतेचा विरोध होता. लोकसभेच्या निवडणुकीतचं भाजप बरोबर युती झालेली आहे. हा पुन्हा प्रकल्प कोणताही असेन तर शिवसेना हाणून पाडेल नारायण राणे यांना शिवसेनेवर आरोप करण्याची सवय आहे.
 
शिवसेनेसाठी नाणार हा विषय संपलेला आहे...

मालवण वायंगणी-तोंडवळी येथील नियोजित सी-वर्ल्ड प्रकल्प कमीत-कमी जागेत उभारण्यास शिवसेना तयार आहे; पण त्यासाठी स्थानिकांनी सहमती दिली पाहिजे. ही सहमती मिळाली तर आम्ही शासकीय अथवा खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारू, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाणार हा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. काही जण हा विषय पुन्हा काढून अस्तित्वासाठी प्रयत्न करीत आहेत, असा टोला सामंत यांनी यावेळी लगावला.

पालकमंत्री सामंत म्हणाले, ""शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पक्षप्रमुख म्हणून यापूर्वीच नाणारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले तरी हा प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे; मात्र सी-वर्ल्ड प्रकल्पाला आमचा विरोध नाही. तेथील स्थानिकांचा विरोध आहे. त्यांनी सहमती दिली तरच हा प्रकल्प होईल.''


सामंत काल एक दिवसाच्या दौऱ्यावर जिल्ह्यात आले होते. त्यांनी जिल्ह्याचे प्रशासन व सरपंच यांच्यासमवेत गणेशोत्सव नियोजन व कोरोना आढावा बैठक घेतली. यानंतर दुपारी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. कोकणातील प्रकल्पांना शिवसेना नेहमीच विरोध करीत आली आहे. त्यांचा हा विरोध राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप होत असल्याकडे लक्ष वेधले असता, पालकमंत्री सामंत म्हणाले, ""मी माझ्या मतदारसंघात पर्यटनावर आधारित पाच प्रकल्प आणले आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणात पर्यटन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.'' यावर सिंधुदुर्गातही असे प्रकल्प आणा, असे सांगितले असता ते म्हणाले, ""या जिल्ह्यात प्रकल्प आणणारे थकले आहेत. त्यामुळे मलाच आता येथे प्रकल्प आणावे लागतील.''
Edited  by : Mangesh Mahale  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com