MP Vinayak Raut requesting to remove minister Narayan Rane
MP Vinayak Raut requesting to remove minister Narayan Rane

राणेंच्या हकालपट्टीसाठी खासदाराचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र

जनआशिर्वाद यात्रा महाड येथे पोहचल्यानंतर राणे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू झाला आहे. राणेंच्या विरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आता राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. (MP Vinayak Raut writes PM Narendra Modi requesting to remove minister Narayan Rane)

जनआशिर्वाद यात्रा महाड येथे पोहचल्यानंतर राणे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून राज्य सरकारकडूनही राणे यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयानं त्यांच्या अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तर उच्च न्यायालयानंही तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राणे यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याविषयी केलेल्या वक्तव्याची माहिती दिली आहे. राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वापरलेली भाषा अत्यंत निंदनीय आहे. राणेंसारख आपली मर्यादा विसरणारे केंद्रीय मंत्री अशा भाषेचा वापर करत असल्याने त्यांना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. अशी भाषा करणारे मंत्री समाजाला काय संदेश देणार आहेत. हा आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आहे. त्यामुळे राणे यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असं राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. 

दरम्यान, मंगळवारी मुंबईत नारायण राणेंच्या जुहू येथील घरासमोर आंदोलन करणारे युवासेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याने पोलिसांनी सैाम्य लाठीमार केला. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली आहे. ही दगडफेक भाजपने केली असल्याचा आरोप युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे.  मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. 

या सर्व वादावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. राणेंच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वक्तव्याचे भाजप समर्थन करत नाही, पण पक्ष आम्ही म्हणून राणेंच्या पाठिशी आहोत, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली. ते म्हणाले की, नारायण राणेंना पोलिसांना अटक केली तरी भाजपची जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. राणेंच्या अनुपस्थितीत प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्त्व करतील आणि ती पूर्ण करतील. 

मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात राणेंनी केलेल्या एका वाक्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बोलण्याच्या ओघात हे झाले असावे. मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिन विसरतात तेव्हा कुणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी भाजप नाही पण पक्ष पूर्ण ताकदीनं राणेंसोबत आहे. कारवाई ज्या पद्धतीनं होतेय ते चुकीचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com