मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांकडून मैत्रीचा हात; सरमांवरील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे

आसाम व मिझोराम सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. यामुळे दोन्ही राज्यांतील चिघळलेला वाद आता शांत होऊ लागला आहे.
mizoram withdraws fir against assam chief minister himanta biswa sarma
mizoram withdraws fir against assam chief minister himanta biswa sarma

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या  हिंसाचार प्रकरणी आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याविरोधात दाखल केलेला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घेण्याची घोषणा मिझोरामचे (Mizoram) मुख्यमंत्री झोरामथांगा (Zormathanga) यांनी केली आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या विरोधात दाखल केलेला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घेण्यात येईल, असे मिझोराम सरकारने म्हटले आहे. यानंतर मिझोरामचे खासदार भाजपच्या सहकारी पक्षाचे मिझोराममधील खासदार के.वानलालवेना (K. Vanlalvena) यांच्याविरोधात दाखल गुन्हा मागे घेण्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली आहे. यामुळे दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध संपले असून, दोन्ही राज्यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. 

मिझोराममधील खासदार के.वानलालवेना (K. Vanlalvena) यांच्या विरोधात आसाम पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. ते सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटचे खासदार असून, हा पक्ष भाजपचा सहकारी पक्ष आहे. आसाम -मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे सहा जवान मृत्यूमुखी पडले होते तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे  देशभरात खळबळ उडाली होती. या हिंसाचारानंतर खासदार वानलालवेना यांनी आसाम पोलिसांनी जाहीर धमकी दिली होती. 

यावर मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे की, ईशान्य भारतातील एकता आसामला कायम ठेवायची आहे. त्यामुळे मैत्रीचे पाऊल उचलत आसाम सरकार मिझो नॅशनल फ्रंटचे खासदार वानलालवेवा यांच्यावरील गुन्हा मागे घेत आहे. परंतु, इतर पोलीस अधिकाऱ्यांवरील गुन्हा कायम राहील. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी सीमावाद चर्चेने सोडवण्याची तयारी दाखवल्याचे मी माध्यमांमधून पाहिले आहे. याचे आम्ही स्वागत करतो. सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी आसाम सरकार कटिबद्ध आहे. 

आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांना शांतता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 

गृहमंत्री अमित शहा नुकतेच ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील काचर, हेलकांडी आणि करीमगंज या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com