mizoram mp K Vanlalvena threatens assam police after border violence
mizoram mp K Vanlalvena threatens assam police after border violence

आम्ही सगळ्यांनाच मारून टाकू! खासदाराची पोलीस दलालाच जाहीर धमकी

आसाम व मिझोराम सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीसदलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या  हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सकारने दोन्ही राज्यांच्या सीमेवर केंद्रीय सशस्त्र राखीव दलाच्या (CRPF) तुकड्या तैनात केल्या आहेत. या हिंसाचारानंतर एका राज्यसभा खासदाराने सगळ्या पोलिसांना ठार मारून टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

मिझोराममधील खासदार के.वानलालवेना (K Vanlalvena) यांनी ही जाहीर धमकी दिली होती. आसाम -मिझोराम सीमेवर 27 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे सहा जवान मृत्यूमुखी पडले होते तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे  देशभरात खळबळ उडाली होती. या हिंसाचारानंतर खासदार वानलालवेना यांनी आसाम पोलिसांनी जाहीर धमकी दिली होती. 

संसदेबाहेर बोलताना वानलालवेना म्हणाले की, आसामचे सुमारे दोनशेहून अधिक पोलीस आमच्या हद्दीत घुसले. त्यांनी आमच्या चौक्यांवरुन आमच्या पोलिसांना पिटाळून लावले. सुरवातीला त्यांनीच गोळीबाराचा आदेश दिला. त्यानंतर आम्ही त्याला उत्तर दिले. आम्ही त्या सगळ्यांना मारून टाकले नाही हे त्यांचे सुदैव आहे. ते पुन्हा आमच्या हद्दीत आल्यास आम्ही त्या सगळ्यांना मारुन टाकू.  

आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांना शांतता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 

गृहमंत्री अमित शहा नुकतेच ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील काचर, हेलकांडी आणि करीमगंज या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com