मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटेना; दोन्ही दावेदार वेगवेगळ्या विमानांनी पुन्हा मोदींच्या दरबारी

सत्ताधारी भाजपने बहुमताचा आकडा गाठला असून, मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे.
BJP
BJPSarkarnama

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सत्ताधारी भाजपने 60 पैकी 32 जागा जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताच्या आकडा गाठला असला तरी मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री बिरेनसिंह आणि आणि ज्येष्ठ नेते थोंगाम विश्वजित यांना या आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. दोन्ही नेते वेगवेगळ्या विमानांनी आज दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत उद्या अधिकृत घोषणा भाजप नेतृत्वाकडून केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बिरेनसिंह आणि विश्वजित यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षा शारदा देवी या 15 मार्चला दिल्लीला दाखल झाले होते. ते १७ मार्चला इम्फाळमध्ये परतले होते. आज पुन्हा भाजप पक्षश्रेष्ठींनी बिरेनसिंह आणि विश्वजित यांना दिल्लीला बोलावून घेतले. दोघेही पुन्हा दिल्लीला गेले. मात्र, दोघे जाताना वेगवेगळ्या विमानांनी गेले. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले सिंह आणि विश्वजित हे दोघेही त्यांच्या मतदारसंघात मोठ्या मतांनी विजयी झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी हे दोघांशी चर्चा करणार आहेत. यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची नावाची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.

BJP
शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात भाजपनं बॉलीवूडमधील हस्तीच उतरवली मैदानात

भाजपने मणिपूरसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना निरीक्षक नेमले आहे. पण मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने अखेर केंद्रीय नेतृत्वानेच सूत्रे हाती घेतली आहेत. मोदी, शहा आणि नड्डा हेच मणिपूरचा पुढचा मुख्यमंत्री ठरवणार आहे. यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या दोन्ही दावेदारांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह (N.Biren Singh) यांनी राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. ते काळजीवाहू म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. बिरेनसिंह यांनी मणिपूरमध्ये (Manipur Election) पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्याने त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे होते. याचवेळी असे केल्यास पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांना डावलले जाईल, असे पक्षातीलच आणखी एक गट म्हणत होता. भाजपच्या प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांना मुख्यमंत्रिपदाचा वादावर काहीही स्पष्ट बोलणे टाळून संसदीय मंडळाकडे बोट दाखवले होते.

BJP
नानांना निवडून आणण्याची जबाबदारी पाटलांनी टाकली महाडिक, चिकोडे अन् जाधवांवर

मणिपूरमध्ये (Manipur) भाजपने कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकला चलोची भूमिका घेतली होती. याचवेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सहा पक्षांशी आघाडी केली होती. काँग्रेसप्रणित मणिपूर प्रोगेसिव्ह सेक्युलर अलायन्स या आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. भाजपने हा 32 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने 5 तर काँग्रेसचे सहकारी पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी 7, संयुक्त जनता दल 6 आणि नागा पीपल्स फ्रंट 5 जागांवर विजयी झाले आहेत. यातील नागा पीपल्स फ्रंट आणि संयुक्त जनता दल आता भाजपसोबत जाणार आहेत. त्यामुळे नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेस हे दोनच विरोधी पक्ष उरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com