यशवंत सिन्हांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला अन् त्यांचे पुत्र जयंत म्हणाले...

भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
jayant sinha says bjp will get majority in west bengal assembly election
jayant sinha says bjp will get majority in west bengal assembly election

कोलकता : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या विद्यमान नेतृत्वाला लक्ष्य करुन पक्षाला रामराम केलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. पित्याच्या तृणमूल प्रवेशाने पुत्र व भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांची मात्र, कोंडी झाली आहे. यावर जयंत सिन्हांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिपद भूषविलेल्या सिन्हा यांनी भाजपच्या विद्यमान नेतृत्वासोबत झालेल्या मतभेदांनंतर २०१८ मध्ये पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे सध्या भाजपचे खासदार असून, ते झारखंडमधील हजारीबाग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यशवंत सिन्हा हे आता तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहेत. 

यशवंत सिन्हा यांच्या तृणमूल प्रवेशाने अनेकांना धक्का बसला आहे. सिन्हांच्या प्रवेशाने सर्वांत मोठा धक्का त्यांचे पुत्र जयंत सिन्हा यांना बसला आहे. यशवंत सिन्हांच्या तृणमूल प्रवेशाबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, असे म्हणत जयंत सिन्हांनी हात झटकले. ते म्हणाले की, बंगालमध्ये या वेळी परिवर्तन होणार आहे. तेथे भाजप मोठ्या बहुमताने विजयी होणार आहे. 

पत्रकारांनी आणखी प्रश्न विचारल्यावर जयंत सिन्हा तेथून निघून गेले. दरम्यान, झारखंड काँग्रेसचे प्रवक्त राकेश सिन्हा म्हणाले की, मागील काही दिवसांपासून भाजपकडून यशवंत सिन्हा आणि त्यांच्या पुत्रावर अन्याय सुरू आहेत. यामुळेच त्यांनी अखेर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यशवंत सिन्हांना भाजपच्या विरोधात एक प्लॅटफॉर्म हवा होता आणि त्यांना तो आता बंगालमध्ये मिळाला आहे. यामुळे त्यांनी ममतांशी हात मिळवला आहे. 

दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी कंदाहार विमान अपहरणाची आठवण सांगितली. इंडियन एअरलाईन्सचे विमान अपहरण करुन कंदाहारला नेण्यात आले होते. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा सुरू होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या ममतांनी विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी स्वत: ओलीस जाण्याची तयारी दर्शविली होती. दहशतवादी जर भारतीयांची सुटका करण्यास तयार असतील तर मी बलिदान देण्यास तयार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. 

विमान प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारताला मसूद अजहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते तर यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते. सिन्हा म्हणाले की, ममतांवर नंदिग्राममध्ये हल्ला झाला त्याच क्षणी मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ममतांना मी अगदी सुरवातीपासून पाहत आहेत. त्यावेळी त्या लढवय्या होत्या आणि आजही त्या तशाच आहेत. 

विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूलला विजयी करणे ही काळाची गरज आहे. यामुळे २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा पराभव निश्‍चित होईल. देशाला वाचविण्यासाठी मोदींना पराभूत करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com