थरारक...तालिबानच्या तावडीत सापडलेल्या 200 भारतीयांची अशी झाली सुटका

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान यांच्यासह सुमारे दोनशे जण काबूलमध्ये अडकले होते. 
indians at kabul embassy finally returns from afghanistan
indians at kabul embassy finally returns from afghanistan

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता स्थापन केली असून, हजारो नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत. भारताचे (India) परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान यांच्यासह सुमारे दोनशे जण काबूलमध्ये अडकले होते. भारताने अतिशय अवघड परिस्थिती आणि कठीण आव्हाने यातून मार्ग काढत कशाप्रकारे या दोनशे जणांना सुखरुपपणे मायदेशी परत आणले याचा तपशील समोर आला आहे.  

काबूलमधील सुरक्षा परिस्थिती बिघडत चालली होती. ही परिस्थिती 15 व 16 ऑगस्टला आणखी बिघडली. यामुळे तातडीने भारतीय कर्मचाऱ्यांना परत आणणे शक्य नव्हते. याचबरोबर भारतीय दूतावासावर तालिबानचीही नजर होती. अनेक देशांचे दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालये असलेल्या उच्च सुरक्षेच्या ग्रीन झोनमध्येही तालिबानने घुसखोरी केली होती. भारतात प्रवास करणाऱ्या अफगाणी नागरिकांना व्हिसा देणाऱ्या शाहिर व्हिसा एजन्सीवरही तालिबानने छापा मारला होता.

भारतीय हवाई दलाच्या विमानातून सुरवातीला 45 जणांची सुटका करण्यात येणार होती. परंतु, काल (ता.16) त्यांना तालिबानने अडवले. यातील काही जणांच्या वस्तू तालिबानने काढून घेतल्या. काबूल विमानतळावरील गोंधळातूनच भारताचे विमान कर्मचाऱ्यांना घेऊन तेथून निघाले. परंतु, नंतर काबूल विमानतळावरील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने उरलेल्या कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर काढणे अवघड झाले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेच्या मदतीने अखेर आज सकाळी उरलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना घेऊन भारतीय विमानाने उड्डाण केले. 


सुमारे 200 भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकले होते. यात परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या जवानांचाही समावेश होता. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू होता. काबूल विमानतळावर मोठा गोंधळ सुरू आहे. भारताचे एक विमान काबूल विमानतळावर उभे असले तरी भारतीय दूतावासातून या भारतीयांनी विमानापर्यंत नेणे अवघड बनले. तालिबानने शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दूतावासातून या भारतीयांना विमानतळावर नेणे धोक्याचे बनले होते. 

काबूलमध्ये अडकलेल्यांमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसचे 100 जवान होते. त्यांच्यावर अफगाणिस्तानमधील दूतावासाच्या सुरक्षेची जबाबदारी होती. अफगाणिस्तानने हवाई हद्द बंद केली आहे. यामुळे इतर देशांना अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करण्यास मनाई आहे. भारत सरकार अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न अखेर यशस्वी झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com