हाथरस प्रकरणावरून गृहमंत्री देशमुख विरूद्ध राम कदम 

भाजपचे नेते राम कदम यांनीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर याप्रकरणावरून निशाणा साधला आहे.
1AnilDeshmukh_RamKadam_060520.jpg
1AnilDeshmukh_RamKadam_060520.jpg

मुंबई : देशभरात हाथरस प्रकरणामुळे आंदोलनं होत आहेत. विविध पक्ष, संघटना पीडीत मुलींला न्याय मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. भाजपचे नेते राम कदम यांनीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर याप्रकरणावरून निशाणा साधला आहे. 

उत्तरप्रदेश मधील हाथरस प्रकरणाप्रमाणेच महाराष्ट्रात अशा प्रकारचे 47 खटले दाखल आहेत. राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार एकट्या मुंबईत विविध प्रकारचे 6 हजार 519 खटले दाखल आहेत. या प्रकरणावर लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्र सरकार याबाबत राजकारण करीत आहेत. त्यांची संवदेना कुठे आहे, अशा सवाल कदम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव न घेता केला आहे.

 
गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी काल हाथरस प्रकरणावर एक टि्वट केलं होतं. याच देशमुख यांनी भाजपवर ताशेरे ओढले होते.  महाराष्ट्र पोलीस व राज्य सरकारवर आरोप करणारे आता बिळात लपून बसले आहेत. #उत्तरप्रदेश मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारांचा साधा निषेध सुद्धा यांनी केला नाही. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'च्या नावाखाली सत्तेत आलेले हे लोक 'बेटी जलाओ'च समर्थन करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत, असा टोला अनिल देशमुख यांनी भाजपला लगावला होता. 
 
उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे, असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर या तरुणीने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींना कठोर शासन करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर चौबाजूने हल्लाबोल होत आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्‌विट करून या प्रकरणाचा निषेध करतानाच योगी सरकारला आरोपीच्या पिंजण्यात उभे केले आहे. पिडितीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर अंत्यसंस्कार रात्रीच का आटपून घेतले हा प्रश्‍नही केला आहे. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पिडितीच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

हे सर्व असले तरी हाथरस प्रकरणाने निर्भयाप्रकरणाची आठवण देशाला करून दिली. ज्या दलित मुलीवर अत्याचार झाले ते निदर्यपणे केले होते. बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशाला हादरा बसला आहे. पिडितेच्या वडलांनी डोळ्यातून अश्रू गाळत एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, की नातेवाईक सोडा आमच्या लेकराजवळ आम्हालाही जावू दिले. तिचा चेहराही नीट पाहता आला नाही. सकाळी अंत्यसंस्कार करू या अशी हातजोडून मी मागणी करीत होतो पण, पोलिसांनी ऐकले नाही. जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचा मृतदेड पोलिस घेऊन गेले आणि अंत्यसंस्कार केले. 

गेल्या 14 सप्टेबर रोजी पिडितेवर चार ते पाचजणांनी बलात्कार केला होता. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. या मुलीची प्रकृती खालावल्यानंतर तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मानेची हाडं तुटण्याबरोबरच जीभलेही जखम झाल्याचे दिसून येत आहे. बलात्कार आणि हत्याप्रकरणात पोलिसांना चार नराधमांना अटक करण्यात आली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com