आधी उघड बंड अन् नंतर माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला रामराम!

पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Congress
Congress File Photo

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. कॅप्टन यांनी एवढे दिवस काँग्रेसचा राजीनामा दिला नव्हता. आज त्यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा देत पक्षाशी पूर्णपणे संबंध तोडले आहेत.

कॅप्टन यांनी काँग्रेस सोडू नये, असा पक्ष नेतृत्वाचा प्रयत्न होता. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनीही कॅप्टन हे पक्षातच राहावेत, अशी भूमिका पक्ष नेतृत्वासमोर मांडली होती. कॅप्टन यांनी पक्ष सोडू नये, यासाठी नेतृत्वाकडून विविध पर्यायांची चाचपणी केली जात होती. त्यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यास मतविभागणी होऊन सर्वाधिक फटका काँग्रेसला बसण्याची भीती नेतृत्वाला वाटत आहे. कॅप्टन यांनी आज काँग्रेसला अखेर रामराम केला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर हल्लाबोल केला.

काँग्रेसकडून तिकिट नाकारले अशा उमेदवारांना कॅप्टन त्यांच्या पक्षाकडून संधी देतील, अशी शक्यता आहे. यामुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होऊन आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो. कॅप्टन यांची मनधरणी करण्याची जबाबदारी काही ज्येष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली होती. परंतु, कॅप्टन यांनी प्रतिसाद दिलेला नव्हता. अखेर त्यांनी काँग्रेससोबतचे संबंध पूर्णपणे तोडून टाकले आहेत.

कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी नव्या पक्षाची घोषणा केली त्यावेळी त्यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. मी प्रदीर्घ काळ काँग्रेससोबत आहे. आणखी दहा दिवस राहिलो तर काय फरक पडतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही कॅप्टनची नवी खेळी तर नाही ना, अशीही शंका व्यक्त होत होती.

Congress
हजारो कोटींच्या मालमत्तांवर 'प्राप्तिकर'ची टाच अन् सोमय्यांकडून यादीच जाहीर

पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे उमेदवार मैदानात उतरवण्याची घोषणा कॅप्टन यांनी केली आहे. याबाबत कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले आहेत की, आमच्यासोबत अनेक काँग्रेस नेते आहेत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर या नेत्यांची नावे आम्ही जाहीर करू. पंजाबमधील सर्वच्या सर्व 117 जागा आमचा पक्ष लढवेल. आम्ही स्वबळावर लढणार की आघाडी करणार याचे उत्तर तुम्हाला आगामी काळात मिळेल. पक्षाच्या नावाची घोषणा लवकरच होईल. कारण आमचे वकील निवडणूक आयोगासोबत या संदर्भात चर्चा करीत आहेत.

Congress
काँग्रेसनं भाजपला अस्मान दाखवलं! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच चारली धूळ

कॅप्टन यांच्या पक्षस्थापनेच्या हालचालींना पंजाबचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी अकाली दलाचे विविध गटांना सोबत घेण्यासाठी पावले उचलली आहेत. असे असले तरी सर्वच राजकीय पक्ष याबाबत सावध प्रतिक्रिया देत आहेत. पुढील वर्षाच्या सुरवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे आतापासूनच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कॅप्टन यांच्याकडे भाजपनेही मैत्रीचा हात पुढे केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com