डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुन्हा होणार नामविस्तार ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावापुढे भारतरत्न किताबाचा उल्लेख करण्याबाबतचा या विद्यापीठाचा ठराव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे.
ramdas.jpg
ramdas.jpg

मुंबई : मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या या मागणीसाठी 17 वर्षे नामांतराचा ऐतिहासिक लढा लढला. त्याला यश येऊन 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 1990 मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारत सरकार तर्फे 'भारतरत्न' हा सर्वोच नागरी सन्मान निर्वाणोत्तर देण्यात आला होता. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात भारतरत्न या किताबाचा उल्लेख करणे आवश्यक असल्याची मागणी करणारे निवेदन कल्याण मधील विधिज्ञ तथा संत रोहिदास समाज प्रबोधन मंडळाचे सचिव अॅड. दिलीप वाळंज यांनी नुकतेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांना बांद्रा येथे दिले. 

अॅड. दिलीप वाळंज यांच्या दाव्यानुसार कोणत्याही महनीय व्यक्तीला भारताचा पद्मश्री ; पद्मभूषण ; पद्मविभूषण, भारतरत्न असे सर्वोच्च किताब दिल्यास त्यांच्या नावापूर्वी या किताबाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्याबाबत पिटीशन क्र.9 /1994 च्या  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तसे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती अॅड. दिलीप वाळंज यांनी दिली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावापुढे भारतरत्न किताबाचा उल्लेख करण्याबाबतचा या विद्यापीठाचा ठराव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत राज्यपालांनी निर्णय घ्यावा, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिफारस करावी अशी मागणी अॅड. दिलीप वाळंज यांनी ना रामदास आठवले यांची बांद्रा येथे संविधान निवासस्थानी भेट घेऊन केली. यावेळी रिपाइंचे अरुण पाठारे सोबत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावापुढे भरातरत्न या किताबाचा उल्लेख झाल्यास या विद्यापीठाचा पुन्हा एकदा नामविस्तार होईल, का असा प्रश्न चर्चिला जात  आहे. याबाबत महाराष्ट्राच्या राज्यपालांना लवकरच पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी अॅड. दिलीप वाळंज यांना दिले. 
Edited  by : Mangesh Mahale      

हेही वाचा : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा कसल्या घेता?
 
नाशिक : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना केंद्र सरकार जेईई-नीट परीक्षा घेण्यावर अडून बसले आहे. चोविस लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा कसल्या घेता? असा प्रश्‍न उपस्थित करत जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आज काँग्रेसतर्फे करण्यात आली. त्यासाठी पक्षातर्फे विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने करण्यात आली. या परिक्षांबाबत सातत्याने घोळ घातला जात आहे. या परिक्षांसाठी चोविस लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, त्याचा समतोल विचार करणे आवश्यक आहे. सध्या शासकीय कार्यालयांपासून तर शिक्षण संस्था, न्यायालये देखील बंद आहेत. मात्र या परिक्षांचाच कशासाठी आग्रह धरला जात आहे. त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी नाशिक शहर काँग्रेसतर्फे करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com