दलित, मुस्लिम, आदिवासींना अनेक भारतीय मानत नाहीत मनुष्य...

उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा हाथसरमधील अत्याचार प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयने हाती घेतला आहे.
congress leader rahul gandhi slams uttar pradesh chief minister yogi adityanath
congress leader rahul gandhi slams uttar pradesh chief minister yogi adityanath

लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हाती घेतला आहे. सीबीआयने आज या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आता या प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपला लक्ष्य केले आहे. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचा दावा केला होता. यावरुन राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री आणि पोलीस म्हणतात कोणावरही बलात्कार झालेला नाही. दलित, मुस्लिम आणि आदिवासी यांनी अनेक भारतीय हे मनुष्यप्राणी मानतच नाहीत. हे अतिशय लज्जास्पद आहे. त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ते कोणीही नाहीत. त्यामुळेत हाथरसमधील पीडिताही मुख्यमंत्री आणि पोलिसांसाठी कोणीही नसते.   

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ती मान्य करुन सीबीआयकडे तपास सोपवला आहे. आता सीबीआयने हा तपास हाती घेतला असून, गुन्हाही दाखल केला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर उद्यापासून (ता.१२) या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीस पीडितेचे कुटुंबीयही उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीला पीडितेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com