मोदी सरकारची कोंडी..राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकवटले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात एकवटले.
congress leader rahul gandhi meets oppostion leaders
congress leader rahul gandhi meets oppostion leaders

नवी दिल्ली : काँग्रेस (Congresss) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्ष (Opposition Parties) केंद्र सरकारच्या विरोधात एकवटले. राहुल गांधींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाश्त्याला बोलावून त्यांची बैठक आज घेतली. पेगॅसस प्रकरण, कोरोना संकटाची हाताळणी, शेतकरी आंदोलन आणि इंधन दरवाढ हे मुद्दे विरोधकांच्या अजेंड्यावर आहेत. यामुळे मोदी सरकारची कोंडी झाली आहे. 

राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात संसदेत थेट ट्रॅक्टर घेऊन येऊन सगळ्यांनाच धक्का दिला होता. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. आज विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांनी नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. या बैठकीनंतर सर्व विरोधी पक्षनेते इंधन दरवाढीचा निषेध करीत सायकलवरुन संसदेत पोचले. विरोधी पक्षांची एकजूट झाल्याने केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

पेगॅसस प्रकरणाचा भूतं केंद्र सरकारची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. संसदेत विरोधी खासदारांकडून पेगॅससच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. पण सरकारचा नकार असल्यानं कोंडी निर्माण झाली आहे. 

आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संसदेत कोणत्याही मुद्यावर चर्चा होत नसल्यानं कामकाज ठप्प झालं आहे. सरकारकडून विरोधकांवर टीका केली जात असून चर्चेचं आवाहन केलं जात आहे. पण विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी राहुल गांधी सरसावले असून त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पुढाकार घेतला आहे. पेगॅससच्या मुद्यावरून ते आक्रमक झाले असून सातत्यानं ट्विटरवरून सरकारवर टीका करत आहेत. विशेष म्हणजे, पेगॅससच्या संभाव्य हेरगिरीच्या यादीत त्यांचे व निकटवर्तींयांचे मोबाईल क्रमांक आढळून आले आहेत. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झालं असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदेचे कामकाज व्यवस्थित चालत नसल्याने सरकारकडून अधिवेशन गुंडाळले जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेसह राज्यसभेतही विरोधकांनी पेगॅससवरून रान पेटवलं आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com