सीबीआय अन् इतर तपास संस्था मदत करत नाहीत; सरन्यायाधीशांची खंत

सीबीआयने आपली मानसिकता बदललेली नाही. न्यायाधीश हे धमकी आल्यास सीबीआय अथवा इतर गुप्तचर यंत्रणांकडे तक्रार करतात. परंतु, या यंत्रणा कोणतीही मदत करीत नाहीत.
cji n v ramana says cbi and other agencies hot help judges
cji n v ramana says cbi and other agencies hot help judges

नवी दिल्ली : झारखंडमधील धनबादमध्ये जिल्हा न्यायाधीश मॉर्निंग वॉक करत असताना त्यांची हत्या (Judge Killing) करण्यात आली होती. याची सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गंभीर दखल घेतली आहे. कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांना धमक्या आल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि इतर तपास संस्था प्रतिसाद देत नाहीत, असे ताशेरे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा (N. V. Ramana) यांनी आज ओढले. 

सरन्यायाधीश रमणा म्हणाले की, कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश तक्रार करतात त्यावेळी तपास संस्था अजिबात मदत करीत नाहीत. सीबीआयने आपली मानसिकता बदललेली नाही. न्यायाधीश हे धमकी आल्यास सीबीआय अथवा इतर गुप्तचर यंत्रणांकडे तक्रार करतात. परंतु, या यंत्रणा कोणतीही मदत करीत नाहीत. माझ्यावर असलेल्या जबाबदारीच्या जाणीवेतून मी हे विधान करीत आहे. 

धनबादमध्ये जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद (वय 49 ) यांची 28 जुलैला हत्या करण्यात आली होती. ते मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांना वाहनाने धडक देऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. यामुळे देशभरात न्यायव्यवस्थेशी निगडित अधिकाऱ्यांवर हल्ले होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच चिंता व्यक्त केली होती. सरन्यायाधीश रमणा म्हणाले होते की, धनबादमधील प्रकरणाचे गंभीर परिणाम दिसून येतील. देशभरात अनेक ठिकाणी न्यायव्यवस्थेतील अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहे. या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी आम्ही सर्व राज्यांकडून अहवाल मागवू. 

न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करण्यास विलंब लावल्याने सुरूवातीला या घटनेचे गांभीर्य समोर आलं नव्हतं. घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर रिक्षाने न्यायाधीश आनंद यांना धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश आनंद हे पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते रस्त्याचे कडेने चालत होते. त्याचवेळी काही अंतरापर्यंत रस्त्याच्या मधून जाणारी रिक्षा न्यायाधीशांच्या जवळ आल्यानंतर अचानक त्यांच्या दिशेने वळते आणि थेट त्यांना धडक देऊन पुढे निघून जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. हत्येच्या उद्देशानेच रिक्षा धडकवण्यात आल्याचेही यामुळे स्पष्ट झाले होते. 

उत्तम आनंद यांच्या हत्येनंतर संपूर्ण न्यायव्यवस्थाच हादरून गेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनने हा मुद्दा सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासमोर उपस्थित केला होती. सरन्यायाधीशांनी या प्रकरणी झारखंडच्या मुख्य न्यायाधीशांशी चर्चा केली होती. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. याची आम्ही दखल घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com