भाजप प्रदेश उपाध्यक्षा वाघ म्हणाल्या,  "योगी आदित्यनाथ दोषींवर कारवाई करा.."

भारतीय संस्कृतीवर विश्वास असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांनी दोषी पोलिसांवर कारवाई करावी.
collage (30).jpg
collage (30).jpg

मुंबई : हाथरस येथे निघालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं उत्तर प्रदेशातील पोलिसांवर अनेकांनी संताप व्यक्त केला.

महिला नेत्यासोबत पोलिसांनी केलेल्या संतापजनक वर्तनामुळे पोलिसांचा निषेध करण्यात येत आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी संबधित पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. 

पोलिसांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा फोटो टि्वट करत वाघ यांनी उत्तरप्रदेश पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत वाघ यांनी टि्वट करीत आपला निषेध व्यक्त केला आहे. आपल्या टि्वटमध्ये चित्रा वाघ म्हणतात की एखादी गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी जर महिला समोर येत असेल तर पोलिसांनी आपल्या मर्यादेचं भान ठेवलं पाहिजे. महिला नेत्याच्या कपड्यावर हात टाकण्याची पुऱूष पोलिसांची हिमंत कशी होती. भारतीय संस्कृतीवर विश्वास असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी दोषी पोलिसांवर कारवाई करावी.

 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी टीका केली होती. देशमुखांच्या टीकेनंतर चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची आठवण करुन दिली होती. हाथरस अत्याचार प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर चित्रा वाघ यांनीही टीका केली होती.

उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे, असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर या तरुणीने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींना कठोर शासन करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल होत आहे.

कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्‌विट करून या प्रकरणाचा निषेध करतानाच योगी सरकारला आरोपीच्या पिंजण्यात उभे केले आहे. पिडितीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर अंत्यसंस्कार रात्रीच का आटपून घेतले हा प्रश्‍नही केला आहे. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पिडितीच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

हाथरस प्रकरणाने निर्भयाप्रकरणाची आठवण देशाला करून दिली. ज्या दलित मुलीवर अत्याचार झाले ते निदर्यपणे केले होते. बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशाला हादरा बसला आहे. पिडितेच्या वडलांनी डोळ्यातून अश्रू गाळत एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, की नातेवाईक सोडा आमच्या लेकराजवळ आम्हालाही जावू दिले. तिचा चेहराही नीट पाहता आला नाही. सकाळी अंत्यसंस्कार करू या अशी हातजोडून मी मागणी करीत होतो पण, पोलिसांनी ऐकले नाही. जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचा मृतदेह पोलिस घेऊन गेले आणि अंत्यसंस्कार केले. 

हाथरस प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता पिडीत कुंटुबीयांच्या नार्को टेस्ट आणि पॅालीग्राफ टेस्ट करण्यास विरोध करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्चन्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि मुंबई येथील सामाजिक कार्यक्रते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली आहे.
Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com