निवृत्त होण्याआधी दिलेला शेवटचा आदेश मुख्य निवडणूक आयुक्तांसाठी अडचणीचा?

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा शेवटचा आदेश वाद्रगस्त ठरण्याची चिन्हे आहेत.
chief election commissioner last order is about gag on mamata banerjee
chief election commissioner last order is about gag on mamata banerjee

कोलकता : प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने  24 तासांच्या प्रचारबंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना या महत्वाच्या टप्प्यावर एक दिवस प्रचारापासून दूर राहावे लागले आहे. हा निर्णयावरुन मोठा गदारोळ उडाला असून, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा हा शेवटचा आदेश वाद्रगस्त ठरण्याची चिन्हे आहेत. 

अरोरा यांचा काल (ता.13) मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेवटचा दिवस होता. त्यांच्या जागी आता सुशील चंद्रा यांची नियुक्ती झाली आहे. अरोरा हे राजस्थान केडरचे आयएस अधिकारी होते. ते २०१६ मध्ये केंद्रीय माहिती सचिव पदावरुन निवृत्त झाले होते.  त्यानंतर त्यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भाजपला झुकते माप दिल्याचा आरोप विरोधकांनी कायम केला आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई करण्यात आखडता हात घेतल्याचा आरोप अरोरा यांच्यावर झाला होता. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अरोरा यांनी भाजप नेत्यांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी कारवाई केली नाही, अशीही टीका होत आहे. अरोरा हे काल निवृत्त झाले असून, त्यांचा निवृत्त होण्याआधीचा शेवटचा आदेश ममतांवरील प्रचारबंदीचा होता. त्यांचा हा आदेश वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. 

प्रचारसभेमध्ये ममतांनी मुस्लिमांच्या मतदानासंदर्भात वक्तव्य आणि सीआरपीएफविरोधात विद्रोह करण्याचे आवाहन लोकांना केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानुसार निवडणूक आरोगाने ममतांना नोटीस बजावली होती. आज आयोगाने ममतांवर कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार 12 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून 13 एप्रिलला रात्री 8 वाजेपर्यंत अशी 24 तास ममतांना प्रचारास मनाई करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ममतांना मोठा झटका बसला. 

या निर्णयाविरोधातही ममतांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीविरोधी आणि असंविधानिक असून त्याविरोधात उद्या धरणे आंदोलन करणार आहे. कोलकातामधील गांधींच्या पुतळ्यासमोर आज धरणे आंदोलन करणार आहोत. 

बंगालमधील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदार पार पडले असून अजून चार टप्पे शिल्लक आहेत. तृणमूलसाठी ममता बॅनर्जी या एकट्याच किल्ला लढवत आहेत. त्यातच त्यांच्या पायाला दुखापत झालेली असल्याने त्यांच्या प्रचाराला आधीच मर्यादा आल्या आहेत. पण त्यानंतर त्या भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

दरम्यान, कूचबिहारमधील घटनेनंतर ममतांनी तिथे जाण्याची घोषणा केली होती. पण निवडणूक आयोगाना त्यांना तिथे जाण्यापासून रोखले आहे. त्यावर टीका करताना ममतांनी निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. ''निवडणूक आयोगाचे नाव बदलून एमसीसी म्हणजे मोदी कोड ऑफ कंडक्ट करायला हवे. भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पण मला आपल्या लोकांसोबत उभे राहण्यापासून आणि त्यांच्या दु:खात सहभागी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही,'' असे ट्विट ममतांनी केले आहे. 

निवडणूक आयोगाने कूचबिहारमध्ये जाण्यापासून तीन दिवस नेत्यांना मनाई केली आहे. रविवारी तृणमूलने ममता बॅनर्जी  तिथे जाणार असल्याची घोषणा केली होती. निवडणूक आयोग आपल्याला केवळ तीन दिवस थांबवू शकतो. पण चौथ्या दिवशी मी माझ्या लोकांपर्यंत पोहचणार, असेही ममतांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com