लॉकडाउन आणखी महिनाभर वाढला...सरकारचे आस्ते कदम

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठीच्या अनलॉक-6 चे दिशानिर्देश केंद्र सरकारने आज जाहीर केले.
central government extends lockdown till November 30
central government extends lockdown till November 30

नवी दिल्ली : आगामी काळ सणासुदीचा असल्याने केंद्र सरकारने लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी आस्ते कदम धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाउन आणखी एक महिनाभर लांबवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक-6 चे दिशानिर्देश जारी करताना मागील दिशानिर्देश यापुढेही चालू ठेवावेत, असे म्हटले आहे. 

कोरोना उद्रेकाचे प्रमाण जास्त असलेल्या कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी 30 नोव्हेंबरपर्यंत कडकपणे करावी, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. राज्ये व राज्यशासित प्रदेशांना कंटन्मेंट झोनच्या बाहेर लॉकडाउन लागू करता येणार नाही. यात राज्य, जिल्हा, उपविभाग, शहर आणि गाव पातळीवरील लॉकडाउनचा समावेश आहे. लॉकडाउन लागू करावयाचा झाल्यास आधी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. कंटन्मेंट झोनमध्ये मात्र, लॉकडाउन लागू राहील. 

अनलॉक - 5 मध्ये चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे 50% प्रेक्षक क्षमतेसह उघडण्यासाठी, तसेच संख्यामर्यादेसह राजकीय मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विशिष्ट अटींसह जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. अनलॉक - 6 मध्येही या परवानग्या कायम असून, यावरील निर्बंध आणखी शिथिल करण्यात आलेले नाहीत. 

देशभरात 10 राज्ये वगळता कोरोनाचा प्रार्दुभाव कमी कमी होत चालल्याचे सध्याच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. अमेरिका-युरोपमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक देशांत पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. काही देशांनी निर्बंध लावलेही आहेतत. 

या  पार्श्‍वभूमीवर कोणताही धोका स्वीकारण्याची केंद्र सरकारची तयारी नाही. विशेषतः ईद, दिवाळी, गुरू नानक जयंती, छट पूजा या सणासुदीच्या काळात कोरोनाविषयक आरोग्य नियमांचे पालन न होण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळेच कोरोना दिशानिर्देश पुढच्या महिनाअखेरपर्यंत चालू ठेवण्यास केंद्र सरकारने सांगितले आहे. मात्र, या काळात आंतरराज्य प्रवासी व मालवाहतुकीला कोणतेही बंधन नसेल. त्यासाठी संबंधित यंत्रणांच्या परवानग्या, अर्ज, वेगळे ई-पास आदींचीही आवश्‍यकता असणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

हे सुरू राहणार
- मल्टीप्लेक्‍स, सिनेमागृहे, नाट्यगृहे ( 50 टक्के प्रेक्षक क्षमतेसह)
- शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास राज्यांना अधिकार; मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी हवी 
- जलतरण तलाव, जिम
- केंद्राच्या निर्देशांचे पालन बंधनकारक 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com