मुकुल रॉय यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव असल्यानं चुकून ते खरंच बोलले..!

भाजपने रॉय यांच्या या विधानाचे भांडवल करण्यास सुरवात केली आहे. आगामी पोटनिवडणुकीत भाजप जिंकणार असल्याचा दावा तृणमूलचे नेते करु लागल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
bjp targets tmc leader mukul roy over west bengal assembly byelections
bjp targets tmc leader mukul roy over west bengal assembly byelections

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) भाजपच्या (BJP) पराभवानंतर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व आमदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांची तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) घरवापसी झाली होती. आता बंगालमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका (Assembly byelections) होत आहेत. या निवडणुका भाजपच जिंकणार असा दावा मुकुल रॉय यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपने (BJP) आता हा मुद्दा उचलला आहे. 

भाजपने रॉय यांच्या या विधानाचे भांडवल करण्यास सुरवात केली आहे. आगामी पोटनिवडणुकीत भाजप जिंकणार असल्याचा दावा तृणमूलचे नेते करु लागल्याचे भाजपचे म्हणणे आहे. याबाबत भाजपचे प्रवक्ते शमिक भट्टाचार्य म्हणाले की, मुकुल रॉय यांनी कृष्णानगर उत्तर मतदारसंघातील मतदारांचा विश्वासघात केला आहे. मात्र, ते आता खरे बोलले आहेत. त्यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव असल्यामुळे अखेर त्यांच्या मुखातून सत्य बाहेर पडले आहे. 

बंगालमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहे. याबद्दल बोलताना माजी केंद्रीय रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला. ते म्हणाले की, बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकांत विजय भाजपचाच होणार आहे. त्रिपुरातही भाजपच जिंकणार आहे. यात कोणतीही शंका नाही.

रॉय यांनी हे विधान केले त्यावेळी उपस्थित तृणमूलच्या इतर नेत्यांना धक्का बसला. नंतर रॉय यांनी त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी तातडीने यात दुरुस्ती केली. ते म्हणाले की, बंगालमधील पोटनिवडणुका तृणमूलच जिंकणार आहे. भाजपचा यात पराभव होईल. माँ, माटी, मानुष हे ब्रीद असलेला आमचा पक्ष विजयी राहणार असून, त्रिपुरातही आम्ही खाते उघडू. भाजपचे राज्यात नामोनिशाण राहणार नाही. ममता बॅनर्जींच्या अधिपत्याखालीच बंगाल राहील. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले होते. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होते. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली होती.  

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे व तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय आणि त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांचा पक्षप्रवेश झाला होता. मुकुल रॉय यांनी ममतांवर व्यक्तिगत पातळीवरील टीका करणे टाळले होते. त्यामुळे त्यांचा समावेश मवाळ नेत्यांमध्ये होता. याचवेळी सुवेंदू अधिकारी यांनी सातत्याने ममतांना लक्ष्य केले होते. त्यामुळे त्यांचा समावेश जहाल नेत्यांमध्ये होता. मवाळ नेत्यांसाठी तृणमूलचे दरवाजे खुले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com