कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी 'एम्स'च्या प्रमुखांनी सांगितली 'त्रिसूत्री'

कोरोना तिसरी लाट पुढील 6 ते 8 आठवड्यांत येणार असल्याचा अंदाज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया यांनी वर्तवला आहे.
aiims chief randeep guleria says testing tracking and treating is important
aiims chief randeep guleria says testing tracking and treating is important

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत येणार असल्याचा अंदाज दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया  (Randeep Guleria) यांनी वर्तवला आहे. तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी त्यांनी त्रिसूत्री सांगिली आहे. 

या लाटेवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत यावर बोलताना डॉ.गुलेरियांनी त्रिसूत्री सांगितली. ही त्रिसूत्री आहे : 

1) पॉझिटिव्हीटी रेट जिथे 5 टक्क्यांच्या वर जाईल तेथे मिनी लॉकडाउन लावणे. 
2) जेवढे जास्त लसीकरण तेवढा धोका कमी त्यामुळे लसीकरण वाढवणे. 
3) टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटिंग हे या तीन गोष्टींवर भर देणे. 

कोरोनाच्या दोन लाटांमधील अंतर कमी होत, अशी चिंता व्यक्त करुन डॉ. गुलेरिया म्हणाले की, पहिल्या लाटेत कोरोना विषाणू फारशा वेगाने पसरत नव्हता. परंतु, दुसऱ्या लाटेत हे सगळेच बदलले. हा विषाणू आणखी संसर्गजन्य बनला. आता या विषाणूचा डेल्टा हा प्रकार अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग नक्कीच आधीच्या लाटांपेक्षा कमी असेल. 

तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्याचा अंदाज गृहित धरुन आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागेल. रुग्णालयात पुन्हा बेडची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकालीन विचार करुन आपल्याला उपाययोजना आखाव्या लागतील. अशा प्रकारे वेगाने संसर्ग वाढल्यास जगातील कोणतीही आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते, असेही गुलेरिया यांनी नमूद केले.  

देशातील अनेक राज्यांत आता निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ.रणदीप गुलेरिया म्हणाले की, देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अपरिहार्य आहे. ही लाट पुढील 6 ते 8 आठवड्यांत येण्याची शक्यता आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकंसख्येचे कोरोना लसीकरण करणे अतिशय गरजेचे आहे. लोक कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करु लागले आहेत. मागील दोन लाटांकडे बघून आपण शिकलो नाही असेच आता म्हणावे लागत आहे. 

अनेक ठिकाणी होत असलेली गर्दी पाहता तिसरी लाट येण्यास 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागेल. रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने वाढण्यास सुरवात होईल आणि नंतर ती राष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसेल. यासाठी 6 ते 8 आठवडे एवढा कालावधी लागू शकतो. याचबरोबर भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्यात एक नवी आघाडी सुरू करण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या बदलत्या प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी हे आवश्यक आहे. भारतातून जगभरात गेलेले डेल्टा-प्लस हा कोरोना विषाणूचा प्रकार धोकादायक मानला जात आहे. 

देशात कोरोना लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी असून, केवळ 5 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झालेले आहे. सरकारने डिसेंबर अखेरपर्यंत 108 कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठरवले आहे. यावर डॉ.गुलेरिया म्हणाले की,  मुख्य आव्हान लसीकरणाचे आहे. आपले लसीकरण झाले असेल तरच आपले कोरोनापासून संरक्षण होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com