अफगाणिस्तान मुक्त केल्यानंतर तालिबान अन् अल कायदाचं आता 'टार्गेट काश्मीर'

अमेरिकेच्या ताब्यातून अफगाणिस्तान मुक्त केल्यानंतर आता तालिबान आणि अल कायदा यांनी भारतातील काश्मीरकडे मोर्चा वळवला आहे.
after afghanistan target of taliban and al qaida will be kashmir
after afghanistan target of taliban and al qaida will be kashmir

नवी दिल्ली : अमेरिकेच्या (USA) ताब्यातून अफगाणिस्तान (Afghanistan) मुक्त केल्यानंतर आता तालिबान (Taliban) आणि अल कायदा (Al-Qaida) यांनी भारतातील काश्मीरकडे (Kashmir) मोर्चा वळवला आहे. त्यांच्या जागतिक जिहादच्या टार्गेटवर आता काश्मीर प्रथमस्थानी आले आहे. त्यांनी यासाठी जागतिक मुस्लिम समुदायाला हाक दिली आहे. यामुळे काश्मीरला धोका निर्माण होणार असून, भारताची डोकेदुखीही वाढणार आहे. 

अमेरिकेच्या ताब्यातून अफगाणिस्तान मुक्त झाल्यानंतर जागतिक दहशतवादी संघटना जल्लोष साजरा करीत आहेत. यानंतर आता या दहशतवादी संघटनांनी काश्मीरकडे मोर्चा वळवला आहे. यामुळे आगामी काळात काश्मीरला धोका निर्माण होणार आहे. याचबरोबर भारत सरकारची डोकेदुखीही वाढणार आहे. तालिबानला पाकिस्तानने मदत केल्याचे समोर आले आहे. यामुळे भारताच्या काश्मीरकडे तालिबान आणि अल कायदा यांची वाकडी नजर वळण्यामागे पाकिस्तान असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अफगाणिस्तानमधील विजयानंतर दहशतवादी संघटनांचे मनोबल वाढले आहे. अफगाणिस्तानमधील विजयावर अल कायद्याने म्हटले आहे की, आपण सर्वांना अफगाणिस्तानमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पश्चिमी देशांनी मुस्लिम देशांवर लादलेल्या जुलमी सत्तेपासून मुस्लिम समाज स्वातंत्र्य मिळवू शकतो, हे स्पष्ट दिसत आहे. अफगाणिस्तानप्रमाणे इतरही ठिकाणी आपण असाच विजय मिळवू. 

काश्मीर हे अनेकवेळा अल कायदाच्या टार्गेट लिस्टमध्ये राहिले आहे. यासाठी आधी अल कायदाने अन्सार गझवातुल हिंद या संघटनेची स्थापना जम्मू-काश्मीरमध्ये केली होती. भारतावर पुन्हा मुस्लिम सत्ता स्थापन करण्याचा उद्देश यामागे होता. अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी हा पाकिस्तानमध्ये असून, तेथून तो काश्मीरसाठी रणनीती आखत आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, मोदी सरकारनं तालिबानसोबत चर्चा सुरू केल्याचं वृत्त आहे. त्यावरूनही वाद निर्माण झाला असून, थेट मोदी सरकारला सवाल केला जात आहे. तालिबान व केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तालिबानविषयीची भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी करत ते म्हणाले की, तालिबानकडं दहशतवादी म्हणून पाहिलं जावं की नाही? तुम्ही त्याकडं कसं पाहता. तर तालिबान ही दहशतवादी संघटना असेल तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा का करत आहात? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com