शिंदेंचा गट पहिल्यांदा कोणावर कारवाई करणार? तर सुनील प्रभूंना हाकलणार...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने भरत गोगावले यांची शिवसेनेच्या पक्ष प्रतोदपदी नियुक्ती केली आहे
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील गुवाहटी येथील संभाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून यात काही धक्कादायक वाक्ये आहेत. हा गट सत्तेवर आल्यानंतर किंवा या गटाकडे सेनेची सूत्रे आल्यानंतर सर्वात प्रथम कोणावर कारवाई करायची, याचा उलगडा या संभाषणातून होते. शिंदे गटाचे म्होरके प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सर्वात प्रथम शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना हाकलणार असल्याचे वाक्य उच्चारल्याचे या व्हिडिओमध्ये ऐकू येते.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुरतमध्ये मंगळवारी (ता. 21) सर्व बंडखोर आमदारांची बैठक घेऊन दोन महत्वाचे ठराव केले होते. या ठरावाचे पत्र बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विधानसभा अध्यक्षांना प्राप्त झाले आहे. या पत्रावर चार अपक्ष आमदारांसह 34 आमदारांच्या सह्या होत्या. त्यानंतर गुलाबराव पाटील, योगेश कदम आणि शिवसेनेच्या सोबत असलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित तसेच चंद्रकांत पाटील हेही गुवाहाटीमध्ये दाखल झाले.

या चार आमदारांचीही भर शिंदे यांच्या गटात पडली आहे. शिवसेनेच्या गटनेते पदी एकनाथ शिंदे आहेत. शिंदे गटाने शिवसेनेच्या पक्ष प्रतोदपदी भारत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. सकाळी शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांना संध्याकाळी पाच वाजेच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश आमदारांना दिले होते. मात्र, त्यांचा आदेश शिंदे गटाने बेकायदेशीर असल्याचे सांगितले. गुहाटीतील हॅाटेलमध्ये शिंदे यांच्याबरोबर सरनाईक, गोगावले, बच्चू कडू हे चर्चा करत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, ''कोणाला पक्षात ठेवायचे कोणाला काढायचे याचे अधिकार आता गोगावले यांना दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या आमदारांना पक्षातून काढायचे असेल तर सुनील प्रभू यांच्यापासून सुरुवात करावी लागणार आहे, असे सरनाईक सांगत आहेत.

Eknath Shinde
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरु...

दरम्यान, पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या तत्वांशी तडजोड केल्याने आमदार नाराज होते, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे ही बैठक घेऊन ठराव करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर देसाई यांच्यासह महाराष्ट्रात परतलेले बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांचीही सही आहे. अपक्ष आमदारांमध्ये बच्चू कडू, राजकुमार पटेल, नरेंद्र भोंडेकर आणि राजेंद्र पाटील यड्रावरकर यांचा समावेश आहे.

पोलीसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार, तुरूंगात असलेले तत्कालीन गृह मंत्री अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या कारणास्तव तुरूंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्यामुळे आमदारांचा भ्रमनिरास झाला आहे. या कारणांसह राजकीय विचारधारा वेगळ्या असलेल्या पण सध्या सत्तेत असलेल्या पक्षांकडून पक्षातील नेत्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. शिवसेना संघटन कमकुवत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे नारायण राणे होतील : शिवसेना नेत्याने आधीच सांगितले होते...

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना संघटनेत मोठी नाराजी आहे. पक्षाच्या तत्वांशी तडजोड करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षांत आमचा पक्ष आणि नेतृत्वाने भिन्न विचारधारेशी हात मिळवणी करून पक्षाच्या तत्वांशी तडजोड केली. पक्षाचे नेते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेमुळे हिंदूत्वाशी तडजोड न करता स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणं अपेक्षित होतं. पण त्या तत्वांशी भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांशी हातमिळवणी करून तडजोड करण्यात आली, असेही पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com