हिंसाचारामुळे देशाचे ऐक्‍य धोक्‍यात : मुखर्जी 

हिंसाचारामुळे देशाचे ऐक्‍य धोक्‍यात : मुखर्जी 

गुवाहाटी : लोकांमधील भेदभावामुळे हिंसाचारात वाढ होत असल्याने आणि मानवी आयुष्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने देशाचे ऐक्‍य धोक्‍यात येत असल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

"नॉर्थ ईस्ट ऍडव्हान्स्ड स्टडीज' या संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त मुखर्जी यांनी मंगळवारी (ता. 22) दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्याख्यान दिले.

"भारतीय समाजातील सहिष्णुता' या विषयार बोलताना ते म्हणाले, की राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या सर्व विषयांमध्ये नागरी सहभागाची आणि बळकट लोकशाहीसाठी संवादाचा पूल तुटू न देण्याची गरज आहे. आज मी पाहतो आहे की मतभेदांमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही चिंतेची बाब असून यामुळे एकोप्याने जगण्याच्या आपल्या क्षमतेवर परिणाम होत आहे. 

भारतीय राष्ट्रवाद हा एक भाषा, एक धर्म आणि एक शत्रू असा मर्यादित नाही, तर तो चिरकाल टिकणारा जागतिक राष्ट्रवाद आहे. देशात 1.3 अब्ज नागरिकांच्या दररोजच्या आयुष्यात ज्या 122 पेक्षा जास्त भाषा आणि बोलीभाषांचा वापर होतो. सात प्रमुख धर्म आहेत,

कॉकेशियन, मंगोलियन आणि द्रविड या तीन मुख्य वांशिक गटांशी संबंधित लोक एका व्यवस्थेखाली, एका ध्वजाखाली नांदत आहे. "इंडियन' किंवा "भारतीय' अशी एकच ओळख या सर्वांची असून, त्यांना कोणीही शत्रू नाही. यामुळेच भारत हा विविधेत एकता असणारा देश ठरला आहे, असे मुखर्जी यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com