शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत? : विनोद तावडे 

जनाची नाही तर मनाची हे वाक्य पवारांच्या तोंडी तरी शोभते काय?-विनोद तावडे
Pawar-Tawde
Pawar-Tawde

मुंबई : " गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान अतिशय धक्कादायक असून, नक्षल्यांचे बोल ते का बोलत आहेत ?" असा सवाल राज्याचे शिक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.

श्री . तावडे म्हणाले ,"गडचिरोलीतील हल्ला हा निषेधार्हच आहे. त्याचा करावा तितका निषेध कमी आहे. पण, लगेच शरद पवार गृहखातं, मुख्यमंत्री, जनाची नाही तर मनाची अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करीत आहेत. जनाची नाही तर मनाची हे वाक्य पवारांच्या तोंडी तरी शोभते काय? 12 मार्चला 1993 मध्ये जेव्हा बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी मुंबई हादरली होती, तेव्हा विधिमंडळात त्यांचा राजीनामा मागण्यात आला होता का ? "

"छत्तीसगडमध्ये अलिकडेच एक नक्षलवादी हल्ला झाला आणि त्यात भाजपाचे आमदार त्या हल्ल्यात मारले गेले. त्यावेळी हेच पवार गप्प का होते? केवळ छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते म्हणून? काँग्रेसने देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्या निर्णयाला आपण याचसाठी का समर्थन दिले", असा प्रश्नही विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com