तीन मित्रांची मते न मिळाल्यानेच विलासराव देशमुख कॉंग्रेसमध्ये राहिले! 

विलासराव देशमुख यांचा 1995 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजपच्या पाठींब्यावर विधान परिषदेची निवडणुक लढली. या निवडणुकीत श्री. देशमुख यांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला.
तीन मित्रांची मते न मिळाल्यानेच विलासराव देशमुख कॉंग्रेसमध्ये राहिले! 

सातारा : विलासराव देशमुख यांचा 1995 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजपच्या पाठींब्यावर विधान परिषदेची निवडणुक लढली. या निवडणुकीत श्री. देशमुख यांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला. त्यावेळी तीन जवळच्या मित्रांनी त्यांना मतदान केले नव्हते. 

या तीन मित्रांमध्ये विलासराव पाटील-उंडाळकर, जयवंतराव आवळे, अनंतराव थोपटे यांचा समावेश आहे. मुळात भाजप-शिवसेनेच्या पाठींब्यावर त्यांनी विधान परिषदेची निवडणुक लढली होती. त्यावेळी या तीन मित्रांनी त्यांना साथ दिली नाही, याचे दु:ख विलासराव देशमुख यांना झाले. पण त्यांनी ते दाखविले नाही. या तीन मित्रांची मते न मिळाल्याने ते निवडून आले नाहीत. त्यानंतर श्री. देशमुख पुन्हा कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात आले. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com