धनगर समाजाने भाजपला साथ दिली, पण विश्वासघात झाला!

धनगर समाजाने भाजपला साथ दिली, पण विश्वासघात झाला!

नगर : धनगर आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यांनी समाजाची फसवणूक केली, असा आरोप करून २९ जुलै रोजी धनगर समाज 'विश्वासघात दिवस' पाळणार असल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ढोणे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात धनगर एसटी आरक्षणाबाबत आंदोलन झाले होते. समाजाने २०१४ साली पंढरपूर ते बारामती अशी आरक्षण पदयात्राही काढली. बारामतीत उपोषणही केले होते. त्या वेळी भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष असलेले व आता मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला येऊन आरक्षणाबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत या समाजाने भाजपला साथ दिली. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे असेच झुलवत ठेवले. समाजाने विद्रोह करू नये, म्हणून डावपेच आखले जात असून, एक हजार कोटींच्या तरतुदीचे केवळ गाजर आहे. धनगर समाजाचा हा गोड बोलून केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचा निषेध करण्याची भुमिका तरूणांनी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत ज्यादिवशी धनगर समाजाला आश्वासन दिले तो 29 जुलै हा दिवस 'विश्वासघात दिवस' म्हणून पाळण्याचे ठरवले आहे, असे ढोणे यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com