मुंबई : एकीकडे सत्ता उपभोगायची आणि पीकविम्यासाठी मोर्चा काढायची हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असून त्यांना खरोखर शेतकऱ्यांची चिंता आणि हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर मोर्चा काढावा, असे आवाहन करत ही शिवसेनेची नौटंकी असल्याची टिका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली.
शिवसेनेने मुंबईत काढलेल्या मोर्चात एकही शेतकरी नाही. त्यांना शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढायचा होता तर शेतकरी आहेत तिकडे काढायला पाहिजे होता. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतासाठी या मोर्चाचा देखावा केला. सत्तेत राहून शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत. देणारे तुम्ही; मग मोर्चे काढून मागणी करता कोणाकडे, असा सवाल करून श्री. वडेट्टीवार म्हणाले, की पिकविम्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याऐवजी त्यांचे मंत्री अधिवेशनात गप्प बसतात आणि आता मोर्चासारखी नौटंकी करतात.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.