ओबीसींवर फडणवीस सरकारनेच अन्याय केला : विजय वडेट्टीवार

ओबीसींवर फडणवीस सरकारनेच अन्याय केला : विजय वडेट्टीवार

नागपूर : मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण शिक्षणात दिले आहे, नोकरीत नव्हे. नोकरीमध्ये आरक्षण देण्याबाबत निर्णय अद्याप झालेलाच नाही. फडणवीस सरकारच्या काळात ओबीसींच्या 90 टक्के जागा रिक्त ठेवण्यात आल्या. तेव्हा त्यांना लाज वाटली नाही का, असा सवाल करीत ते जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना आज पत्रकारांशी बोलताना केला. 

वडेट्टीवार म्हणाले, ते धर्मांध वागत असतील तर ती त्यांची भूमिका आहे. पण सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण नोकरीत दिलेले नसल्यामुळे ओबीसींवर अन्याय करण्याचा प्रश्‍नच नाही. ओबीसींच्या जनगणणेचा राज्य सरकारने दिलेला प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला. यासाठी आमचे शिष्टमंडळ राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जाणार आहे. मोदींनी प्रयत्न केल्यास ही जनगणना होऊ शकते. पण हुकुमशहा मोदी तसा प्रयत्न कदाचित करणार नाहीत. ते स्वतः ओबीसी आहेत, पण त्यांना ओबीसींबाबत कुठलाही कळवळा नाही. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यात सर्वत्र होणार आहे. पण ज्या भागांत आचारसंहिता सुरु असेल, तिथल्यासाठी निर्णय घेण्यात येईल. शेतकऱ्याचा आत्महत्या कोणत्याही सरकारला शोभणारी नाही. पाथर्डी येथील शेतकऱ्याने केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे. या सरकारला केवळ अडीच महीने झाले आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा. आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com