लोकांचा जीएसटीला विरोध होता, पण मोदींना नव्हता - विजया रहाटकर

Vijaya-Rahatkar
Vijaya-Rahatkar

औरंगाबाद: " पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वाखाली भाजपने सहा वेळा गुजरात राज्य जिंकले आहे. आम्ही विकासाचे राजकारण केले, तर काँग्रेसने द्वेषाचे - फोडाफोडी राजकारण केले.

पण गुजरातच्या जनतेने विकासाला मत देत मोदींच्या स्वच्छ व पारदर्शक कारभाराला मत दिले. या निकालावर आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत ",अशा शब्दांत भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी गुजरात विजयावर सरकारनामाशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

" गुजरातच्या निकालाकडे जागचे लक्ष्य लागले होते. नोटबंदी, जीएसटीचा फटका भाजपला बसेल असे आडाखे मांडले गेले. पण प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही. आमच्या जागा गेल्या वेळी पेक्षा कमी झाल्या असल्या तरी पन्नास टक्के गुजराती जनतेने भाजपला भरभरून मतदान केले हे नाकारून चालणार नाही. "

"आमच्या जागा घटल्या यावर चर्चा करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधकांनी हिमाचल प्रदेशच्या निकालावर देखील बोलावं ", अस आव्हान विजया रहाटकर यांनी दिल.  

जातीचे, द्वेषाचे राजकारण करणाऱ्या काँगेस आणि त्यांचे अध्यक्ष राहूल गांधी यांचा प्रभाव निवडणुकीत नव्हताच, पण पाटीदार समाजात फूट पाडण्यात काँग्रेस यशस्वी झाली असा आरोप रहाटकर यांनी केला.

त्या म्हणाल्या ," काँगेसला विचार नव्हता, अजेंडा नव्हता. निवडणूक येताच त्यांना मंदिर दिसू लागली. आम्ही मात्र यांनीं वेडा ठरवलेल्या विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढलो या आणि जिंकलो."

" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा उत्तम लिडर, अमित शाह यांच्या सारखे मजबूत संघटन आणि सुसंघटित कार्यकर्त्यांची फ़ौज होती. पाच बुथ मागे एक शक्ती केंद्र, हजार मतदारांमागे 15-20 कार्यकर्ते, तीस मतदारांमागे एक पन्नाप्रमुख संपूर्ण राज्यात नेमले होते.

या ताकदीवर आम्ही पुन्हा सत्ता राखली. मोदी, शहा या नेत्यांनी विभाग, जिल्हानिहाय बैठका तर घेतल्याचं पण पन्ना प्रमुखांना देखील मार्गदर्शन केले. या शिवाय पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत 5 ते 7 सभा घेतल्या, तेव्हा हा विजय आम्ही पाहतोय."

 पंतप्रधान मोदी यांचे गुजरातच्या जनतेशी हार्ट टू  हार्ट  असे कनेक्शन आहे. मोदी गुजराती जनतेचे प्राण आहेत हे पुन्हा सिद्ध  झाल्याचे विजया रहाटकर म्हणाल्या. लोकांचा जीएसटी, नोटबंदीला विरोध होता, पण मोदींना नव्हता आणि म्हणून ते मुद्दे गुजरात निवडणूकित चालले नाहीत.

 " गुजरात निवडणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता. कमळ मेहंदी सारख्या अभियानातून आम्ही अनेक महिला आणि नवे मतदार जोडले. मोदी ऍप च्या माध्यमातून आधी साडेदहा हजार महिला आणि त्याद्वारे लाखो महिलांचा मोदींशी संवाद घडवून आणला. गावागावात संवाद कार्यक्रम, वाहन रॅली, घर घर संपर्क साधला."

गुजरात तर आम्ही राखलेच आहे, हिमाचल प्रदेश काँग्रेस कडून हिसकावून घेतले. आता कर्नाटक आणि 2019 मध्ये पुन्हा देशाची सत्ता हातात घेऊ असा   आत्मविश्वास विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com