पूरग्रस्त ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकरांनी घेतले दत्तक

ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसले असताना गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यावेळी बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. 3 हजार 500 लोकसंख्या असलेले हे गाव वंचित बहुजन आघाडीने दत्तक घेतल्याचे कळताच गावचे संरपंच व गावक-यांनी समाधानी व्यक्त केले आहे.
पूरग्रस्त ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकरांनी घेतले दत्तक

मुंबई  : सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ हे पूरग्रस्त गाव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतले आहे. गावचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आंबेडकर यांनी घेतली आहे. 

ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसले असताना गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यावेळी बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. 3 हजार 500 लोकसंख्या असलेले हे गाव वंचित बहुजन आघाडीने दत्तक घेतल्याचे कळताच गावचे संरपंच व गावक-यांनी समाधानी व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गाव देत आहोत, असे जाहीर केले आहे.
पुनर्वसनांतर्गत गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार केले जातील. तसेच 700 कुंटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था केली जाईल. गावातील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य दिले जाईल. 

गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावण्यात येईल. गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम राबविले जातील. त्याचप्रमाणे गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com