शिवसेना - भाजपचा विरोध पण उल्हासनगरात पुन्हा पाचव्यांदा अभय योजना

.
Ulhasnagar.
Ulhasnagar.

उल्हासनगर : एकदा-दोनदा-तिनदा नाही तर तब्बल पाचव्यांदा बहुमतांच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी अभय योजनेचा ठराव पास केला आहे.

अगोदरच गोरगरिबांनी दागिने गहाण ठेऊन प्रामाणिकपणे मालमत्ता मालमत्ताकर भरला आहे.वसुलीचे अवघे तीन महिने राहिले असतानाच, महासभेत अभय योजना लागू करणे म्हणजे करबुडव्यांनाच अभय ,असा आरोप करून शिवसेनेसह भाजपाच्या काही नगरसेवकांनी योजनेचा विरोध केला.मात्र सत्ताधाऱ्यांनी मतदानाच्या जोरात योजनेचा ठराव मंजूर करून घेतला.

साईपक्षाच्या दिप्ती दुधानी यांनी अभय योजना लागू करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर केल्यावर  शिवसेनेचे राजेंद्र चौधरी,रमेश चव्हाण,सुनील सुर्वे,अरुण आशान,वसुधा बोडारे,भाजपचे डॉ.प्रकाश नाथानी,मीना सोंडे, रिपाइं आठवले गटाचे भगवान भालेराव,पी आर पीचे प्रमोद टाले यांनी विरोध करताना लाखों रुपयांची थकबाकी असलेल्या करबुडव्यांना अभय देण्यासाठी ही योजना लागू करता काय ? असा सवाल उपस्थित केला.

त्यावर महापौर पंचम कलानी यांनी मतदान घेण्याच्या सूचना दिल्यावर शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका निभावली. आणि बहुमतांच्या जोरावर अभय योजनेचा प्रस्ताव पास झाला. यापूर्वी मनसेचे सचिन कदम, बंडू देशमुख,संजय घुगे,प्रदिप गोडसे आदींनी करबुडव्यांकडून प्रथम वसुली करा आणि नंतरच गरिबांना लक्ष करा अशी मागणी आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे केली होती. तेंव्हा करबुडव्यांना आश्रय दिला जाणार नाही असे आश्वासन हांगे यांनी दिले होते.

मागच्या वर्षी मालमत्ता कराची वसुली 96 कोटींच्या घरात गेली होती.यावर्षी  वसुलीचे 100 कोटींचे मिशन पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी समोर ठेवले आहे.त्यासाठी 4 पथक प्रमुख व 14 विशेष सहाय्यक पथक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

उल्हासनगरात पावणेदोन लाख मालमत्ता धारक असून चालू वर्षात अधिकारी विनायक फासे यांच्या नेतृत्वाखाली एप्रिल ते नोव्हेंबर महिन्या दरम्यान 48 कोटींची वसुली झाली आहे.मार्च अखेरीपर्यंत वसुलीचे 100 कोटींचे मिशन पूर्ण करण्याचा निर्धार असल्याने त्यासाठी मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, मुख्यलेखाधिकारी विकास चव्हाण, नगररचनाकार मिलिंद सोनावणी,शहर अभियंता महेश सितलानी यांची पथकप्रमुख तसेच गणेश शिंपी,प्रतिभा कुलकर्णी,विजय मंगलानी,भगवान कुमावत,अजित गोवारी,संतोष जाधव,अशोक जाधव,दगडू वानखेडे,जितू चोईथानी,संदीप जाधव,यशवंत सगळे,परमेश्वर बुडगे,संजय पवार,धनराज चव्हाण,यांची सहाय्यक पथकप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 त्यांच्या हाताखाली कर निरीक्षक आणि स्थानिक बिट मुकादमाची जोडी देण्यात आली असून मदतीला एक वसुली लिपिक आणि एक वसुली सहाय्यक लिपिक देण्यात आला आहे.या पथकाने त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील किमान 10 मालमत्ता धारकांना दररोज भेट देऊन वसुलीची कारवाई करावी, असे लेखी आदेश आयुक्त अच्युत हांगे यांनी दिले आहेत.

उल्हासनगरात पावणेदोन लाख मालमत्ता धारक असून त्यांच्याकडून दरवर्षी जेमतेम 60-70 कोटींच्या घरात वसुली होत होती.मात्र मागच्या वर्षी तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी अभय योजना राबवली होती.या योजनेअंतर्गत दंडात्मक रकम माफ करण्यात आली होती.

याशिवाय रॅली काढण्यात आल्याने व जनजागृती राबविण्यात आल्याने मुख्यलेखाधिकारी दादा पाटील,संतोष जाधव यांच्या देखरेखीखाली 96 कोटींच्या घरात वसुली झाली होती.चालू वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 48 कोटींची वसुली झालेली आहे.आता अवघे तीन महिने बाकी असून अभय योजना नसल्याने 100 कोटींचे मिशन पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करण्याची वेळ येण्याची शक्यता होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com