मिळालेले अपयश हे उत्तुंग यशामध्ये परावर्तीत करणार!

केंद्रात भाजप युतीचे सरकार आहे, तर महाराष्ट्रात भाजप, शिवसेना मित्रपक्षांच्या युतीचे सरकार येत आहे. त्यामुळे आम्ही सातारा लोकसभा मतदारसंघातील शाश्वत विकासाचे जे चित्र पाहिले आहे. ते सत्यात साकारण्यासाठी अथक आणि प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.
मिळालेले अपयश हे उत्तुंग यशामध्ये परावर्तीत करणार!

सातारा : बहुचर्चित सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सर्वसामान्य जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्विकारत असून, तो आम्हास शिरसावंद्य आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आम्हास ज्यांनी भरभरुन साथ दिली, मनापासून आशिर्वाद दिले, ज्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही अशा सर्वांचे आम्ही आभार मानतो, या शब्दांत सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मतदारांचे आभार व्यक्‍त केले.

यासंदर्भात त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले की, तीन-चार महिन्यांत राजीनामा देवून पुन्हा जनतेचा कौल घेण्याचा आमचा निर्णय मतदार राजाला रुचला नसावा. आमच्याकडूनही काही बाबतीत दुर्लक्ष झाले असावे. म्हणूनच जनतेने हा कौल दिला आहे आणि तो आम्हाला मान्य आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी, जय-पराजय येत असतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पराजय सुध्दा महत्वाचा ठरतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक धुरंदर-दिग्गज राजकीय, ऐतिहासिक व्यक्‍तिमत्वांना आमच्यापेक्षाही कठिण परिस्थितीचा, अपयशाचा सामना करावा लागला आहे. म्हणूनच पराभवाने खचुन न जाता, मिळालेले अपयश हे उत्तुंग यशामध्ये परावर्तीत करण्यासाठी, सिंहावलोकन करुन, पुन्हा नव्या उमेदीने आणि जिद्दीने आम्ही जनसेवेला यापुढील काळात स्वतःला झोकून देणार आहोत, असे आश्‍वासनही उदयनराजेंनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com