समृद्धी महामार्गबाबत शिवसेनेची कोलांटउडी?

मी स्वत: मंत्री एकनाथ यांना सांगितले होते. मंत्र्यांनी स्वत: जावून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांवर कसल्याही प्रकारची जबरदस्ती होणार नाही. जे काही करूच शकत नाहीत ते यामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. - उद्धव ठाकरे
समृद्धी महामार्गबाबत शिवसेनेची कोलांटउडी?


समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या

संमत्तीनेच जमिन खरेदी- उद्धव ठाकरे

मुंबई : ''जो पर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तो पर्यंत हा महामार्ग होणार नाही ही शिवसेनेची कालही भूमिका होती अन् आजही तिच आहे. समृद्धी महामार्ग होतोय त्या मार्गावरील शेतकऱ्यांना शिवसेने वचन दिले होते. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. समृद्धी महामार्गसाठी शेतकऱ्यांच्या संमत्तीनेच जमिन खरेदी करण्यात आली आहे.'', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना भवन दादर येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "मी स्वत: मंत्री एकनाथ यांना सांगितले होते. मंत्र्यांनी स्वत: जावून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांवर कसल्याही प्रकारची जबरदस्ती होणार नाही. जे काही करूच शकत नाहीत ते यामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या समाधानाशिवाय समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे.  शिवसेना आणि मंत्र्यांची भूमिका वेगळी नाही. जिथे जमीनी देणं अशक्य आहे, तिथे आम्ही विरोध करणारच, त्या शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेतो शेतकऱ्यांना दिलासा देऊन, त्यांच्यासोबत राहून आम्ही विकास काम करत आहोत. त्यासाठी सुधारित प्रस्ताव जो असेल तो आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत."
 
शहापूर विभागातील शेतकऱ्यांच्या राहते घरे आणि सुपिक जमिनीमधून हा महामार्गातून जात होते. या महामार्गामुळे सुपीक जमिन आणि झाडे जाणार आहेत. शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला होता. विकास करताना कुणाच्या स्वप्नाचा चुराडा होणार नाही. या मताची शिवसेना आहे. आता जोरजबरदस्तीने शेतकऱ्यांची जमिनी घेवू नका ही भूमिका शिवसेनेची असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेनेची भूमिका बदलली का? मंत्र्यांची भूमिका वेगळी आणि पक्षप्रमुखांची भूमिका वेगळी अशा बातम्या प्रसारित झाल्या, त्या चुकीच्या आहेत. पक्ष प्रमुख आणि पक्षापुढे मला मंत्रीपद प्रिय नाही. या प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, कोणत्याही शेतकऱ्यावर जोरजबरदस्ती करायची नाही असे आदेश उद्धव साहेबांनी मला दिले होते. हिंगणी येथील शेतकरी स्वच्छेने आले होते. मी त्यांनाही विचारलं होतं की तुम्ही स्वखुषीने आलात का? तुम्हाला कोणी जबरदस्ती केली नाही ना ? त्यानंतरच त्यांच्या जमिनीची खरेदी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिला आहे. ज्यांचा विरोध असेल त्यांच्याशी खात्याचा मंत्री म्हणून संवाद साधणार आहे.'' ज्यांची शेती नाही, त्यांच्या या प्रकल्पाशी संबध नाही ते शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com