महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे जागतिक नकाशावर आणणार : उद्धव ठाकरे 

मुंबई येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या रोखठोक मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनीअनेक विषयांना स्पर्शकेला. उद्योग व पर्यटन क्षेत्राबाबत मत व्यक्त करताना त्यांनी आगामी काळात करणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली
Uddhav Thackeray Talks About Tourist Destinations in Maharashtra
Uddhav Thackeray Talks About Tourist Destinations in Maharashtra

नगर : ''महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी मी स्वतः अशा ठिकाणी जाऊन भेटी देणार आहे. तेथील उणीवा, गरज लक्षात घेऊन अशा स्थळांचा विकास करून ती जागतिक नकाशावर नेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणार,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या रोखठोक मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. उद्योग व पर्यटन क्षेत्राबाबत मत व्यक्त करताना त्यांनी आगामी काळात करणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, ''सरकार एखाद्या प्रतिभावान व्यक्तिला ब्रॅंण्ड अॅम्बेसिडर नेमते, नंतर अशा लोकांना पुढे काय करायचे, ते काहीच माहिती नसते. तो तात्पुरता खुष होतो. परंतु, ते कशासाठी नेमले, याचा उद्देश पाहणे आवश्यक असते. त्यामुळे मी असे ठरविले आहे, की आता यापुढे अशा नियुक्त्या करण्यापेक्षा आपण स्वतः अशा स्थळांना भेटी द्यायच्या. पर्यटनस्थळे म्हणजे केवळ पर्यटकीय दृष्टीची स्थळे नाही, तर त्यामध्ये काही जंगले असतील. लेण्या असतील. धार्मिकस्थळे, तीर्थस्थळे असतील. तेथे मी स्वतः जाणार आहे. मी एकटाच नाही, तर माझ्यासोबत विविध क्षेत्रातील नामवंतांना बरोबर घेऊन जाणार आहे.''

ते पुढे म्हणाले, ''काही पर्यटक, कलाकार, संबधित अधिकारी यांचा ताफा बरोबर असेल. त्यामुळे त्या स्थळांचा टुरिस्ट मॅप तयार होऊन अशा पर्यटनस्थळांचा विकास करणे शक्य होईल. महाराष्ट्रातील अशी स्थळे जागतिक नकाशावर कसे नेता येईल, याचे नियोजन करण्यात येईल. तसेच तेथील चांगले फोटोही काढणार आहे. फोटोग्राफी तर माझा छंद आहे. तो मी सोडणार नाही. तो काही वाईट नाही. मी पर्यटनस्थळांना भेटी देताना कॅमेरा घेऊन जाणार आहे.''

उद्योग-धंद्यांसाठी धोरणात्मक निर्णय

महाराष्ट्रातील काही आैद्योगिक वसाहती ओस पडल्या आहेत. तेथे मोठे उद्योजक यायला तयार नाही. ते का येत नाहीत, याची कारणे शोधून तशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. सहकारी साखर कारखाने, उद्योजकांनी सरकारच्या धोरणांचा फायदा घ्यायला हवा. एमआयडीसीची अडचण लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेणार आहोत. सरकार म्हणजे केवळ पैसा उकळण्याचे धोरण नाही. हा जनतेचा पैसा आहे. त्याचा योग्य उपयोग झालाच पाहिजे. त्यासाठी सर्व गोष्टीचा विचार करून आैद्योगिक क्षेत्रातील अडचणी दूर केल्या जातील, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com