उद्धव ठाकरेंनी गाडी थांबवून कांदा शेतकऱ्यांचे निवेदन घेतले 

उद्धव ठाकरेंनी गाडी थांबवून कांदा शेतकऱ्यांचे निवेदन घेतले 

नाशिक ः शेतकऱ्यांना पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाडी थांबविली आणि त्यांनी कांदा निर्यादबंदीबरोबरच इतर समस्यांचे निवेदन स्वीकारले. 

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी विविध घटक, शेतकरी व संघटनांचा पाठपुरावा सुरु आहे. नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी शेतकरी मागणीचे निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना सुरक्षा व्यवस्थेमुळे विलंब झाला. ते पोहोचले तेव्हा मुख्यमंत्री गाडीत बसले आणि त्यांचे लक्ष शेतकऱ्यांकडे गेले. त्यांनी शेतकऱ्यांना बोलावून निवेदन स्वीकारले. त्यांनी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादकता घटल्याने मोठे नुकसान झाले आहे, त्यातच कांदा दरात घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांना दररोज आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

केंद्र सरकारने कांद्यावरील कांदा निर्यातबंदी तातडीने उठविण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आणि राज्य प्रवक्ते शैलेन्द्र पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. 

शेतकऱ्यांचा मागणीचा विचार करून कांदा निर्यात सुरू व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून मदतीचे आश्‍वासन दिले. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी समाधान व्यक्त केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com