युती तोडली म्हणजे आम्ही धर्मांतर केलेले नाही ,उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला 

युती तोडली म्हणजे आम्ही धर्मांतर केलेले नाही ,उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला 

पुणे : "" युती तोडली म्हणजे आम्ही धर्मांतर केलेले नाही,'' असा जोरदार टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नाव न घेता लगावला. 

नागपुरातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. गेल्या दोन दिवसापासून फडणवीस हे स्वा. सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका करीत आहेत. त्याचा समाचार आज त्यांनी घेतला.

2014 मध्ये जेव्हा भाजपने युती तोडली तेव्हाही आम्ही हिंदुत्त्वादी होतो आणि आजही हिंदुत्ववादी होतो याची आठवण फडणवीस यांना करून देताना ते म्हणाले, की युती तोडली म्हणजे आम्ही धर्मांतर केले का ? सत्तेवर आलो आहोत. आम्ही नम्र आहोत तशी शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे. मी जनतेची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री बनलो आहे. यापूूर्वी अनेक सरकारे राज्यात येऊन गेली आहेत आपले सरकार इतरांपेक्षा निश्‍चितपणे वेगळे असेल. जनतेला फरक दिसला पाहिजे. 

कशासाठी सत्तेवर बसलो ? 
शेतकरी कर्जमुक्तीवरून फडणवीस हे शिवसेनेवर टीका करीत आहेत त्याचा समाचारही ठाकरे यांनी आपल्या भाषणात घेतला. ते म्हणाले, की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी असा सवाल काही लोक करीत आहेत. पण, आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, करणार आहोत ना ! कशासाठी आम्ही बसलो आहोत सरकारवर! शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तर आम्ही सत्तेवर आलो आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com