उदयनराजेंच्या पराभवाचे दुःखच : संभाजीराजे 

उदयनराजेंच्या पराभवाचे दुःखच : संभाजीराजे 

सांगली : राज्यमंत्री मंत्रिमंडळाची वर्षातील एक बैठक रायगडावर व्हावी असा निर्णय नव्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

कवलापूर येथे किल्ले पन्हाळगडाच्या प्रतिकृतीच्या उद्‌घाटनासाठी ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील उदयनराजे यांचा पराभव हा आमचाच असून त्याचे मनस्वी दुःख होत असल्याचेही नमूद केले.

ते म्हणाले,""शिवरायांनी स्वराज्य निर्मिती कुणासाठी केली हे आजही सामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी शिवरायांची राजधानी रायगडावर बैठक व्हायला हवी. हे राज्य पुढे न्यायचे असेल तर शिवरायांच्या स्वराज्याचा अर्थ समाजायचा असेल तर तिथे बैठक होणे गरजेचे आहे. दहा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने शंभर कोटी दिले आहेत. त्याचा या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी फायदा होणार आहे.''

ते म्हणाले,""उदयनराजे यांचा पराभव त्यांचा बंधू नावाने आमचाच पराभव आहे. छत्रपती घराण्याला सुख-दुःख बघण्याची सवय छत्रपती घराण्याला सवय आहे. दुःख आले तरी तो पराजय विजयाच्या दिशेने कसा नेता येईल याचे त्यांच्याकडे नियोजन असेल. मला खात्री आहे ते उदयनराजे त्यातून बाहेर पडतील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com