कऱ्हाड, बारामती जिल्हा निर्मितीला माझा विरोधच : उदयनराजे

कऱ्हाड, बारामती जिल्हा निर्मितीला माझा विरोधच : उदयनराजे

कऱ्हाड : मी अडून राहिल्यामुळेच कऱ्हाड व बारामती जिल्हा करण्याच्या प्रयत्नाला यश मिळाले नाही. अन्यथा, सातारा जिल्हा यापूर्वीच संपुष्टात आला असता, असा गौप्यस्फोट माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे केला. माझे राजकारण द्वेशापोटी नसून इश्‍यू बेस असते. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री असताना पाठपुरावा करून पृथ्वीराज चव्हाण यांनी जर सातारला कृषी विद्यापीठ आणले असते तर या विद्यापीठाला त्यांचेच नाव देण्यासाठी मी स्वतः सूचना केली असती, असेही त्यांनी सांगितले. 

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल येथे मुक्कामी होते. येथील एका हॉटेलवर मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर यात्रा सांगली जिल्ह्यात रवाना झाली. त्यानंतर श्री. भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका वृत्तपत्रातील अग्रलेखाच्या निमित्ताने विचारलेल्या प्रश्‍नांवर ते म्हणाले, मी कधीही बेशिस्त नव्हतो, हाताची पाचही बोटे सारखी नसतात, त्यानुसार प्रत्येकाचा स्वभावही एकसारखा नसतो. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. कॉलर उडवणे बेशिस्त असेल तर यापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आजपर्यत का निर्णय घेतले नाहीत, ती शिस्त आहे का ? स्टाईल इज स्टाईल असे सांगून कॉलर उडवणे सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सूचित करत लोकांशी माझी कमिटमेंट आहे अन ती शेवटपर्यत राहिल असेही सांगितले. 

राष्ट्रवादी सोडल्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कालही आदर करतो अन्‌ आजही आदर करतो. भविष्यातही तो राहिल. श्री. पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणाला सांगण्याची आवश्‍यकता नाही. पोटनिवडणुकीत लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी असेल यावर ते म्हणाले, लोकशाहीत कोणीही उभे राहू शकते. माझी उमेदवारी आहेच, तुम्ही उभे रहा. अभिजित बिचुकलेंचे नाव घेतले तर मला अटक करतील, अशी टिप्पणीही त्यांनी केली. सातारा शहराच्या हद्दवाढ मुख्यमंत्र्यानी केल्याचे सांगून ते म्हणाले, 1968 ला सातारा शहराची शेवटची हद्दवाढ झाली. त्यानंतर लोकसंख्या वाढली आहे. सातारा शहर व उपनगरांची आज लोकसंख्या दोन लाखांवर आहे. त्यामुळे तेथे सोई-सुविधा द्याव्या लागत आहेत. त्यासाठी निधीची आवश्‍यकता असून हद्दवाढीचीही गरज आहे. अनेक वर्षापासून हद्दवाढीचा विषय प्रलंबित होता. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमोरही मांडणी केली होती. मात्र त्यांनी हद्दवाढ का केली माहिती नाही. 

यानंतर ते म्हणाले, सातारा कृषी विद्यापीठासाठी भरपूर प्रयत्न करूनही ते झाले नसल्याचे सांगून ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यामुळे का झाले नाही याचे उत्तर तेच देवू शकतील. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राची मागणी होती. माझे राजकारण द्वेशापोटी नसून इशू बेस असते. त्यामुळे संकुचित विचार कधीही करत नाही. वैद्यकीय महाविद्यालयही प्रलंबित होते. आगळा वेगळा वारसा असणाऱ्या सातारा जिल्ह्याने राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. श्री. चव्हाण पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. त्यांचा संपर्कही देशभर चांगला होता. त्यांनी प्रयत्न केले असते तर कृषी विद्यापीठ झाले असते. ते झाले असते तर त्यांचेच नाव विद्यापीठाला द्यावे असे मी सूचवले असते. पत्रकार परिषद सुरू असलेल्या ठिकाणचा कऱ्हाडचा परिसर आज सातारा जिल्ह्यात नसता असे सांगून उदयनराजे म्हणाले, सातारा जिल्हा मागेच संपुष्टात आला असता. अडून राहिलो म्हणूनच कऱ्हाड व बारामती जिल्हा करण्याच्या प्रयत्नाला यश मिळू दिले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com