तूर खरेदी सुरू न झाल्याने सरकारी आदेशाची होळी

तूर खरेदी सुरू न झाल्याने सरकारी आदेशाची होळी

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही आज (ता. 28) सायंकाळपर्यंत पैठण येथील खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू न झाल्यामुळे अन्नदाता शेतकरी संघटनेने तूर खरेदी आदेशाची होळी करत सरकारचा निषेध केला. 
22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व बाजार समिती, सहकार निबंधक, तहसीलदार यांना दिले 

आहेत. मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत पैठण येथील केंद्रावर तूर खरेदी सुरू झाली नव्हती. याचा निषेध म्हणून अन्नदाता शेतकरी संघटनेने तालुका उपनिबंधक कार्यालयासमोर शासनाच्या तूर खरेदी आदेशाची होळी केली. वेळोवेळी नवे आदेश, अटी, नियम लादत सरकारकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू आहे.तूर खरेदी केली जाणार म्हणून शेतकरी रणरणत्या उन्हात आपली पोती गाडीत टाकून वाट पाहतोय. मात्र दिवसामागून दिवस उलटत असले तरी तूर खरेदी काही केली जात नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना गाडी भाड्याचा नाहक भुर्दंड बसतोय. तूर खरेदीला आणखी उशीर झाला तर शेतकऱ्याचे अर्धे पैसे गाडी भाड्यातच जातील परिस्थिती असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com