तूर खरेदी न केल्यास राज्यभर आंदोलन करू - राज

'सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्र सुरू केली. परंतु, सुरुवातीपासूनच ह्या ना त्या कारणाने शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. कधी म्हणाले, गोदामात जागा शिल्लक नाही, कधी बारदान उपलब्ध नाही म्हणाले तर कधी वजनकाटे नसल्याचे कारण सांगितले गेले - राज ठाकरे
Raj
Raj

मुंबई - सरकारने सर्व तूर खरेदी केंद्रे येत्या २४ तासात सुरू करावीत आणि शेतकरी घेऊन आलेली सर्व तूर ताबडतोब सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने खरेदी करावी अन्यथा आम्ही सर्व राज्यभर आंदोलने करू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

शेतकरी सरकारच्या भरवशावर घरदार सोडून तिथे आला आहे आणि लाखो क्विंटल तूर प्रत्येक खरेदी केंद्रावर शिल्लक असतानाही खरेदी केंद्र बंद केली जात आहेत. 'शेतकरी घेऊन येतील ती सर्व तूर खरेदी करू' असं आश्वासन सरकारच्या वतीने मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले होते. परंतु, सरकार कडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

''सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्र सुरू केली. परंतु, सुरुवातीपासूनच ह्या ना त्या कारणाने शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. कधी म्हणाले, गोदामात जागा शिल्लक नाही, कधी बारदान उपलब्ध नाही म्हणाले तर कधी वजनकाटे नसल्याचे कारण सांगितले गेले आणि बरीच खरेदी केंद्रं सतत बंदच ठेवण्यात आली. शेतकरी तूर घेऊन आले पण त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. यावरूनच सरकारचा उद्देश स्पष्ट होतो.'' असेही राज ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com